• Sat. Mar 7th, 2026
    …तर त्याच्या कानाखाली आवाज काढा; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना सल्ला, असं का म्हणाले?

    Uddhav Thackeray: मतदारयादीतील बोगस मतदार नष्ट करणे, मतचोरीचा पर्दाफाश करणे आणि मुंबई; तसेच पुण्यातील विरोधकांच्या यंत्रणा पाडणे यावर शिवसेनेचा भर असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

    Uddhav Thackeray news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मतदारयादीतील घराघरांत पोहोचून बोगस मतदार शोधणे आणि प्रत्यक्ष मतदानादिवशी बोगस मतदार आढळल्यास त्याच्या कानाखाली आवाज काढणे हे प्रत्येक बूथ प्रमुखाचे आणि शिवसैनिकाचे कर्तव्य आहे,’ असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यातील शिवसैनिकांना केले.

    ठाकरे यांनी पुण्यातील शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शन दिले. या वेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, मिलिंद नार्वेकर, हर्षल प्रधान, महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल आंबेकर, मेघना काकडे, लतिका पाष्टे, शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे यांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
    Maharashtra Timesपुणे गँगवॉर! ‘बदला तो फिक्स, आता फक्त बॉडी मोजा’, आंदेकर टोळीच्या 5 समर्थकांचा माज, पोलिसांनी मुसक्या आवळल्या
    ठाकरे म्हणाले, ‘प्रत्येक शाखेत गटप्रमुख असणे आवश्यक आहे. शाखा ही जनता दरबार म्हणून कार्यरत असावी. शाखेत हजेरी लावणे, नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि स्थानिक कामकाजाबद्दल माहिती ठेवणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. सत्ता नसली, तरी शाखा आणि जनता यांच्यातील नाळ कायम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शाखांना नियमित भेट देणे, पदाधिकाऱ्यांचे काम तपासणे आणि लोकांशी थेट संपर्क ठेवणे आवश्यक आहे आपल्याला जिंकायचे असल्यास हरलेल्या मानसिकतेने नव्हे, तर जिंकण्याची ईर्षा आवश्यक आहे. मजबूत शाखा आणि सक्रिय गटप्रमुखांशिवाय विजय मिळवणे शक्य नाही.’

    ‘वरचेवर पुण्यात येईन’
    पुणे : ‘युतीमधील जागावाटपामुळे माझे पुण्यात येणे कमी झाले. मात्र, आता वरचेवर पुण्यात येईन,’ अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. अजित नागरी पतसंस्थेच्या महिला मेळाव्यात ठाकरे बोलत होते. खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, माजी नगरसेवक वसंत मोरे आदी या वेळी उपस्थित होते.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात रात्री उशिरा मित्रांमध्ये वाद; प्यासा हॉटेलसमोर राडा, पहाटे तिघांनी मिळून तरुणाला संपवलं!
    उत्साहाच्या भरात हुरळून जाऊ नका
    ‘पुणे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीवेळी माझ्या सभेला न्यू इंग्लिश स्कूल मैदानात खूप गर्दी होती. त्या वेळी व्यासपीठावर कोणी तरी येऊन सांगितले, की काल इकडे मुख्यमंत्र्यांची सभा होती. रिकाम्या खुर्च्यांमुळे तत्कालीन मुख्यमंत्री सभा न घेताच परतले. त्यामुळे आपण शंभर टक्के जिंकणार, असे मला सांगितले गेले. मात्र, निकाल लागल्यानंतर रिकाम्या खुर्च्या आपल्या नशिबी आणि भरलेल्या खुर्च्या त्यांच्या नशिबी गेल्या. मुख्यमंत्र्यांना सभा न घेता परत जावे लागले असताना त्यांचे १०० नगरसेवक निवडून आले कसे? त्यामुळे उत्साहाच्या भरात हुरळून जाऊ नका. घात करून घ्याल,’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
    Maharashtra TimesPune News : ‘बंड्या तुला माज आला का’, बापू पठारे आणि खांदवेंमध्ये काय घडलं, पुण्यातील रात्रीच्या तुफान राड्याची ईनसाईड स्टोरी
    शिवसेनेच्या शाखा म्हणजे जनता दरबार आहे. आता मला प्रत्येक शाखेत गटप्रमुख हवा आहे. संघटनेची बांधणी जोपर्यंत भक्कम होत नाही, तोपर्यंत सभेला रिकाम्या खुर्च्छा असून, विरोधक जिंकले कसे? आणि भरलेले मैदान असून आपण हरलो कसे ? याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा