Solapur Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे. यातच आता सोलापूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने बाईकला धडक दिल्यानं दाम्पत्यासह युवकाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यानं, जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याच्या दिशेने करमाळ्याकडे भरथाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने क्र. एम.एच 04 इएफ 1001 करमाळा शहराकडून अंजनडोह गावाकडे दुचाकीवरुन क्र. एमएच 45 यु 3805 जाणाऱ्या हनुमंत फलफले, कांचन हनुमंत फलफले आणि हनुमंत यांची बहीण स्वाती शरद काशीद यांना जोरदार धडक देत फरफटत नेले. हे तिघेही एकाच दुचाकीवर अंजनडोहकडे निघाले होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडाला अडकून कार पूर्णपणे पलटी झाली.
Nagpur Crime : चॉकलेटचं आमिष देऊन चिमुकलीला पाचव्या मजल्यावर नेलं, घरातील पाणी संपलं म्हणून महिला वर गेल्या तर…
करमाळा-वीट रस्त्यावरील भुजबळ वस्तीजवळ हा भीषण अपघात झाला. कारमधील राजू विनोद पोत्रे (वय 19), विनोद शंकर धोत्रे (वय 50), अपर्णा दत्तत्रय होले (वय 25), राहुल विनीय धोत्रे (वय 23), भारत योत्रे (वय 23), जयश्री विनोद धोत्रे (वय 45) आणि कार्तिक दत्तात्रय होले (वय 3 वर्षे ) असे 7 जण या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या कमलाई हॉटेलचे सोमनाथ भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी झुडपातून चारीत पलटी झालेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Raigad Crime : उसने पैसे परत मागितल्याचा राग, दगडाने मारुन मित्राची निर्घृण हत्या; रायगड हादरलं
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याचे पीआय रणजित माने, एपीआय गिरीजा मस्के व त्यांचे सहकारी यांच्यासह वीट गावातील माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह राजे भोसले आणि इतरांनी मिळून माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून मदत केली.

