Anil Parab Press Conference : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपांना आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले असून १९९३ ला कदमांच्य पत्नीने जाळून घेतलं की जाळलं याचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
बाळासाहेब गेल्यानंतर चौदा वर्षांनी त्यांना कंठ फुटला आहे. बाळासाहेब 2012 ला गेले त्यानंतर 2014 साली कदम हे मंत्री झाले, त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर त्यांनी 2014 ला मंत्रीपद का स्वीकारलं? 2014 ते 2019 मंत्रीपद वरपलं, त्यानंतर 2019 ला मुलाला आमदारकी घेतली. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून सर्व काही मिळत होत तोपर्यंत ते चांगले होते. 2012 मध्ये रामदास कदम मातोश्रीच्या कोणत्या बाकड्यावर असले होते तो बाकडा मी शोधतोय. बाळासाहेब ज्या खोलीत होते तिथे फक्त एक डॉक्टर नाही तर संपूर्ण डॉक्टरांचं पथक होतं. तिथे असंख्य लोक भेटायला येत होते, प्रत्येकाला माहीत होतं की बाळासाहेब जिवंत आहे त्यांची प्रकृती खूप खालावली होती. मात्र त्याचं आता राजकारण करत महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीवर लक्ष बाजूला न्यायच हा याच्या मागचा कुटील डाव आहे. रामदास कदम यांची मागणी आहे की नार्को टेस्ट करा, यावर आमचही म्हणणं आहे की, नार्को टेस्ट करा म्हणजे सत्य बाहेर येईल. मात्र आम्ही कदमांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत आहे. ती रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.
मोठी बातमी : बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ, उद्धवजींनी आदित्य ठाकरेंची शपथ घ्यावी, रामदास कदमांचं ओपन चॅलेंज
बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते घेतलं की जाळलं?
रामदास कदम यांची आणखीन एक नार्को टेस्ट करावी, १९९३ मध्ये कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते घेतलं की जाळलं? हे समोर आलं पाहिजे. खेडमध्ये कोणाला बंगले बांधून दिले, त्यावरून काय राजकारण झालं हे सर्व समोर आलं पाहिजे. नार्को टेस्टला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा योगेश कदम याच्याकडे गृहखात्याची सूत्र आहेत. याच चौकशीची मागणी मी करत आहेत. ९३ ला गृहमंत्राच्या आईने जाळून घेतलं होतं? या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, असं परब यांनी म्हटलं आहे.
Solapur Crime : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटेंच्या भावावर हल्ला, अजितदादांच्या नेत्यावर आरोप, Video समोर
मुख्यमंत्री त्यांना का वाचवत आहेत. डान्सबार चालवत आहेत, वाळू चोरतायेत, जमिनी लाटतायेत, दादागिरी करतायेत, मागील अधिवेशनापासून लोकं समोर येत सांगत आहेत. कदम यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे, ही आत्महत्या का केलीय? घरातील लोकं का आत्महत्या करतायेत याची चौकशी योगेश कदम केली पाहिजे. मुख्यमंत्र्यानी आपली प्रतिमा चांगली स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकललं पाहिजे, असं म्हणत अनिल परब यांनी जोरदार टीका केली. या अधिवेशनामध्ये पुराव्यांसह सर्व समोर आणणार असल्याचं अनिल परब म्हणाले. यावर आता कमद काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

