उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहील याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचं सांगताना ठाकरे म्हणाले, की आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षनिष्ठेची खातरजमा करण्यासाठी उमेदवारांकडून लेखी शपथपत्र घेण्यात येणार आहे
यासंदर्भात शुक्रवारी माहिती देताना विकास ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणूक लढण्यासाठी पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. १५१ जागांसाठी आतापासूनच १ हजार ५०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे योग्य उमेदवार दिला जावा हाच पक्षाकडून प्रयत्न असेल. यासाठी यंदा एक वेगळा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये प्रभागनिहाय ६० बूथमधील ९०० पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. उमेदवार निश्चित करताना पदाधिकाऱ्यांचीही अडचण होत असेल किंवा एकमत होत नसेल, तर निवडणूक घेऊन अंतिम उमेदवार निश्चित करण्यात येतील, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. उमेदवार निश्चित केल्यानंतर स्थानिक कार्यकारिणीकडून राज्य समितीकडे नाव पाठवण्यात येणार आहे.
मुंबई, अतिवृष्टी ते मोदी.. ठाकरे-शिंदेंमध्ये हमरी-तुमरी; या मुद्यावर गाजला दसरा मेळावा
हा प्रयोग पश्चिम नागपूरमधील झिंगाबाई टाकळी प्रभागात सुरू झाला असून लवकरच तो संपूर्ण नागपूर शहरात राबवण्यात येणार आहे. हा फॉर्म्युला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यामुळे पक्ष संघटनेला बळकटी मिळेल, तसेच उमेदवारामागे संपूर्ण बुथस्तरीय यंत्रणा उभी राहील. त्याचबरोबर पक्षातील गटबाजी, शिफारशींचा अतिरेक आणि अंतर्गत असंतोष टाळता येईल, असा विश्वास विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
Maharashtra Politics : योगेश कदमांचा ठाकरे गटाला दणका, काका सदानंद कदमांचा कट्टर समर्थक फोडला, कोकणात उलटफेर
उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहील याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्ष निष्ठेची खातरजमा करण्यासाठी उमेदवारांकडून लेखी शपथपत्र घेण्यात येईल. कोणताही उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर थेट भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांचंही उदाहरण त्यांनी दिलं. गजभिये यांना काँग्रेसने संधी दिली, ते प्रकाशझोतात आले आणि नंतर भाजपमध्ये जाऊन जिल्हाध्यक्षही झाले, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शपथपत्र अनिवार्य असल्याचं ठाकरे म्हणाले.
Vaibhav Khedekar : दोनदा भाजप प्रवेश रखडला, मनसेतून बडतर्फ वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार? उदय सामंत म्हणाले, मी हमी देतो…
‘माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नवीन नाहीत’
यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार आहे ही चर्चा 1997 पासून सुरु आहे. इतक्या वर्षानंतर अजूनही काही नेते आणि कार्यकर्ते या प्रकारच्या वावड्या पसरवत आहेत. मी काँग्रेसमध्ये जन्माला आलो, वाढलो आणि काम करतोय. त्यामुळे पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत विकास ठाकरे यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

