राज्यभरात पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईसह उपनगरात नवरात्रीच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र शनिवारपासून पावसाने उघडीप घेतली आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातही पाऊस थांबला आहे, पण आधी झालेल्या अतिवृष्टीने तेथील शेतात, घरांमध्ये चिखल पसरला आहे. अतिवृष्टीने शेतात गुडघाभर पाण्यात उभी पिक आडवी झाल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशात शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी होते आहे.
Breaking News 4th October 2025 : वाचा शनिवार, आजच्या ४ ऑक्टोबर २०२५ च्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
