• Sun. Jun 14th, 2026

    Dhananjay Munde : भगवानगडावर धनंजय मुंडे सुरेश धसांवर अप्रत्यक्ष बरसले, पंकजांचं कौतुक करत म्हणाले, 250 दिवस…

    Dhananjay Munde : भगवानगडावर धनंजय मुंडे सुरेश धसांवर अप्रत्यक्ष बरसले, पंकजांचं कौतुक करत म्हणाले, 250 दिवस…

    Dhananjay Munde News : बीडमध्ये भगवान गडावर दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात समर्थकांनी हजेरी लावली होती. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दमदार भाषण केले. धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणामध्ये बोलताना एक आठवण सांगितली. गेल्या अडीचशे दिवसांमध्ये पंकजा मुंडे माझ्याजवळ येऊन बसत असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : माझी बहीण मागील २५० दिवसांमध्ये माझ्याजवळ येऊन बसत होती आणि मला आधार देत होती. माध्यम माझ्याविरोधात मीडिया ट्रायल चालवत होतं, त्यावेळेला मला माझ्या बहिणीने, पक्षाच्या महायुतीच्या नेत्याने आधार दिला. माझ्याविरोधात घोटाळा काढला, कोर्टात गेले, पण मला क्लीन चीट मिळाली, जो कोर्टात गेला त्याला लाख रूपयांचा दंड, पण मी तरीही आज शिक्षा भोगतोय, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

    पंकजा ताईंनी त्यांच्या भाषणात उल्लेख करावा, आजचा दसरा मेळावा अभूतपूर्व आहे. हा मेळावा होण्यासारखी परिस्थिती नव्हती, नद्यांना पूर आला. आम्ही ताईंशी बोललो आणि निर्णय घेतला की काही झालं तरी मेळावा घ्यायचा. मी मंत्री नाही आमदार आहे, पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे, शेतकऱ्याचा शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत पंकजा ताई महायुती सरकारकडून मदत मिळवून देतील असा विश्वास मी व्यक्त करतो. दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा भगवान गडाचं उद्घाटन स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केलं, दिवसापासून आजपर्यंत या मेळाव्यापर्यंत परंपरा आहे. या दसरा मेळाव्याला देशाच्या ऐतिहासिक नकाशावर गोपीनाथ मुंडे साहेबांनी नेलं. आज मला आमच्या बहिणींचा अभिमान वाटतो साहेब गेल्यावरही आज ही परंपरा सुरू ठेवली, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesPankaja Munde : समोर कराड समर्थनाचे पोस्टर, पंकजा मुंडे म्हणाल्या, कुणाचे तुकडे उचलू नका, गुंड पाळू नका
    मागच्या दसरा मेळाव्याला मी होतो, त्यातील अनेकजण मागे आता दिसत नाहीत. पुढे निवडणूका नाहीत असं त्यांना वाटतं, एक लक्षात घ्या. इथं आलेला प्रत्येक जातीतला, बाबांचा अनुयायी या सगळ्याला कोण जर संपवायला निघाला असेल तर त्याला दहा जन्मसुद्धा संपवता येणार नाही. बऱ्याच जणांना ऐकायचं आहे, मी बरेच दिवस बोललो नाही. मी विचार केला शांत बसणं बरोबर आहे. काही न करता शिव्या खालल्या पाहिजेत. मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या-ज्या वेळेस ज्या जातीचा मुद्दा आला त्यावेळी काम करणारा कार्यकर्ता आहे, हे तुमच्यापासून लपलेलं नाही. मराठी आंदोलनाला आरक्षण दिलंय याचा मला आनंद आहे कारण त्या मराठा आंदोलनाच्या चळवळीमध्ये आम्ही होतो. काही जणांना आरक्षणाच्या आड राहून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे. ओबीसीचं आता आलेला एमपीएससीच्या निकालाचा कट ऑफ होता ४८५ आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल ४५०, म्हणजे ४५० मार्क इतर समाज म्हणून जे कोणतचं आरक्षण मिळत नाही. जर इकॉनॉमिक विकर सेक्शनमध्ये भरला असता तर ४५० पास पास झालो असतो. प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आल्यानंतर ४८० घेतले तरी नापास आहेत. काही ठराविक लोकांना फक्त स्वत:ला खुर्ची मिळावी यासाठी, सरकारने मराठा समाजातील लोकांना आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आणि करत आहेत. आम्हाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, आरक्षण दिलंय आमचं म्हणणं काही नाही पण एकाच्या ताटातून घेऊन दुसऱ्याच्या ताटात, शेवटी हा मेळावा विचारांची देवाणघेवाण असल्याचंही मुंडे म्हणाले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा