• Sat. Jun 6th, 2026
    कर्जवसुलीच्या नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा; विजय वडेट्टीवारांचे खळबळजनक वक्तव्य

    Vijay Wadettiwar: कर्जवसुलीच्या नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा, असे खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केले.

    wadettiwar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नगर, धाराशीवमध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले असतानाही बँकांनी कर्जवसुलीच्या नोटीस दिल्या. अशा नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा. त्यांच्यासोबत सरकारचा माणूस येत असल्यास त्यालाही ठोकून काढा. प्रसंगी कायदा हातात घ्या, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

    राज्यातील पूरपरिस्थितीवर वडेट्टीवार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २४ जिल्ह्यांतील १३७ तालुके बाधित झाले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यातील पिकांचे नुकसान २६ लाख हेक्टरवर गेले आहे. अशावेळी बँकेकडून शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीची नोटीस कशी काय देण्यात आली, असा सवालही त्यांनी केला. बँकांनी सक्तीची कर्जवसुली करू नये म्हणून सरकारने पत्र काढणे आवश्यक असल्याचेही मत त्यांनी मांडले.
    Maharashtra TimesAnil Deshmukh: धान, संत्री, सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करा; अनिल देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
    सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्‌ध्वस्त झाला आहे. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभे करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे. अजूनही केंद्राकडून पाहणी करायला पथक आलेले नाही, केंद्राला राज्य सरकारकडून कधी प्रस्ताव जाणार आहे, मदत कधी मिळणार याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
    Maharashtra Timesयंदा दसऱ्यालाही जोरदार बरसणार पाऊस, नागपूरसह विदर्भाला यलो अलर्ट; हवामान विभागाचा ताजा अंदाज
    बँकांकडून वसुली नाही
    शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस आल्याचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे. बँकेच्या त्या नोटिसाही जुन्या आहेत. तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना कुठेही वसुली करू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : …म्हणून पोलीस ग्रेट आहेत, राजस्थानहून पळवून आणलेल्या तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा डाव उधळला
    ओला दुष्काळ जाहीर करा- वडेट्टीवार
    राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. पिके आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तातडीच्या या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आग्रह करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा