• Sun. Mar 8th, 2026
    ‘…आणि अण्णांनी आम्हाला पहिली मारुती कार घेऊन दिली’; उदय सामंत यांनी सांगितली वडिलांची मोठी आठवण

    Uday Samant : रत्नागिरी येथील मारुती सुझुकी कंपनीच्या नवीन कारचं लॉन्चिंग होतं तेव्हा, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कंपनीच्या मालकावर आणि कंपनीवर स्तुतीसुमने उधळली. उदय सामंत या कार्यक्रमात बोलत होते.

    रत्नागिरी उदय सामंत कार लॉन्चिंग कार्यक्रम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आमच्या आयुष्यात दोन्ही भावांना आमच्या वडिलांनी म्हणजेच अण्णांनी जी पहिली कार घेऊन दिली. ती होती मारुती कार, त्यांचा विश्वास मारुती कंपनीवर इतका आहे की ते आत्ता पाच सात वर्षांपूर्वी पर्यंत एमझेडओ 1188 हा नंबरही मला आठवतो. याच मारुती कारमधूनच आमचे अण्णा फिरायचे’, अशी मोठी आठवण राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितली. रत्नागिरी येथील उद्योगपती राजू जोशी यांच्या जागृत मोटर्स येथे मारुती सुझुकी कंपनीच्या VICTORIS नवीन मॉडेल लॉन्चींग कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

    सामंत पुढे म्हणाले की, ‘आमच्याकडे पहिल्यांदा सेकंड हॅन्ड फियाट होती. त्यानंतर पहिली गाडी आमच्याकडे मारुती 8-100 आली. आम्ही ज्यावेळी उद्योगधंद्यामध्ये आलो त्या वेळेला वडिलांनी सांगितलं की, तुम्हाला दोन्ही भावांना गाडी घेऊन द्यायची आहे. आम्ही मोठ मोठ्या गाड्यांची नावे सांगितली, पण आमचे वडील म्हणाले नाही, की माझा फक्त विश्वास मारुती सुझुकीवर आहे. जेव्हा तुम्ही कमवायला लागाल त्यावेळेला काय ती इम्पोर्टेड गाडी घ्या, पण मी तुम्हाला गाडी घेऊन द्यायची असेल तर ती मारुती कारच घेऊन देणार, आणि वडिलांनी आम्हाला मारुती कार घेऊन दिली. तुमच्या सगळ्या आशीर्वादाने उद्योगधंदा मोठा झाल्यानंतर आमच्याकडे बऱ्यापैकी कार आहेत. पण त्या कारमधून कधी आमचे अण्णा फिरले नाहीत. ते नेहमी मारुती कार मधूनच फिरायचे म्हणजे आम्ही त्यांना गमतीने कधीकधी त्यांना सांगायचो की त्याची आता डेक्कनच्या विमानासारखी परिस्थिती झाली आहे. पण ते नेहमी सांगायचे सगळ्यात सुरक्षित गाडी कोणती आहे तर ती मारुती कंपनीची आहे. म्हणून मारुतीचं अस्तित्व हे माझ्यासारखा कार्यकर्ता समजून घेणार आहे’, असे गौरवउद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    Maharashtra TimesPune News: सायकलला जोरदार धडक, वृद्ध डंपरखाली चिरडले गेले, घटनेने बारामतीकरांमध्ये संतापाचं वातावरण

    ‘आपल्या जिल्ह्यामध्ये 63% कार मारुती कंपनीच्या कार रस्त्यावर आहेत, आणि आपण देशाचा जर विचार केला तर 50% पेक्षा जास्त कार या मारुती कंपनीच्या रस्त्यावर धावणाऱ्या आहेत.’ ‘राजकारणामध्ये व धंद्यामध्ये नवीन येणाऱ्या पिढीवर असलेली पिढी आक्रमण करते हा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजे मी ज्या वेळेला राजकारणामध्ये सुरुवात केली त्यावेळेला अगोदरचे कोण नेते असतील तर त्यांना नेहमी वाटायचं की याला जास्त भाषण करायला दिले तर हा आपल्या पुढे जाईल. पण इथे तर अशी परिस्थिती नाही. आदित्य राजकारणात नाही त्यामुळे तो कितीही बोलला तरी मला काही फरक पडणार नाही,’ असं मिश्किल विधान सामंत यांनी केलं. पण त्याची मानसिकता किती चांगली आहे पहा, त्याने कर्मचाऱ्यांचाही उल्लेख केला मालक हा स्वतःच्या ताकदीवर कधी मोठा होत नसतो. पण जागृतचे मालक राजू जोशी व कुटुंबामध्ये कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्याची दानत या कुटुंबामध्ये आहे. मोबाईल व गुगलच्या आक्रमणामध्येही आदित्यसारखी नवी पिढी ही आपल्याला ज्यांनी मोठं केलं त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात. हाच खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा व जोशी कुटुंबियांचा संस्कार आहे’, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा