• Sun. Mar 8th, 2026
    भक्ती मयेकरला कॉल करुन छळणाऱ्या सीताराम वीरबाबत मोठी अपडेट, पोलीस तपासात रिक्षावाल्याने काय सांगितलं?

    Bhakti Mayekar Murder Case : प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर कॉल आणि मेसेज करून त्रास देतो, असा संशय दुर्वास पाटीलला आला होता.

    भक्ती मयेकर हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : रत्नागिरी येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणानंतर तिहेरी हत्याकांड उघड झाले. या प्रकरणात दुर्वास पाटील आणि त्याचे तीन साथीदार कोठडीत आहेत. तिहेरी हत्याकांडाच्या साखळीतील पहिला खून झालेल्या सीताराम वीर यांच्याबाबत पोलिसांकडे मोठी माहिती हाती आली आहे.

    कळझोंडी येथील सीताराम वीर यांना दुर्वास पाटील आणि त्याच्या दोघा साथीदारांनी खंडाळा येथील सायली बारमध्ये मारहाण केली होती. त्यानंतर दुर्वासने सीताराम वीर यांना ज्या रिक्षातून घरी पाठवलं होतं, त्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. या खुनामध्ये दुर्वास पाटीलसोबतच त्याचा बाप दर्शन पाटील याचाही हात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

    दुर्वास पाटील याची प्रेयसी भक्ती मयेकर हिला सीताराम वीर हा कॉल व मेसेज करून त्रास देतो, असा संशय दुर्वास याला आला होता. सीताराम याला धडा शिकवायचा असा पण दुर्वास याने केला होता.

    २९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम हा दुर्वास पाटील याच्या सायली बारमध्ये दारु पिण्यासाठी आला होता. यावेळी दुर्वास आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी सीतारामला बेदम मारहाण केली. मात्र सीताराम दारू पिऊन पडला आणि जखमी झाला अस भासवण्याचा प्रयत्न दुर्वास पाटीलने केला होता
    Maharashtra TimesPune Fire : पालक कामावर, पुण्यातील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत होरपळून मुलाचा मृत्यू, आई धावत घरी पोहोचली, पण…
    यामध्ये सीताराम यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने घाबरलेल्या दुर्वासने खंडाळा रिक्षा स्टॅन्डवरून एका रिक्षा चालकाला बोलावून वीर यांना घरी सोडून येण्यास सांगितले. सीताराम वीर हा बारमध्ये चक्कर आल्याने पडून जखमी झाला असे भासवलं. दुर्वासने सीतारामसोबत रिक्षाने एक माणूस पाठवून दिला. रिक्षा चालकाने सीताराम वीर यांना कळझोंडी येथील घरी सोडलं. ते घरी बेशुद्धावस्थेतच पोहोचले होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी तातडीने घरच्यांनी जवळच्या डॉक्टरांना बोलावलं होत. परंतु घरी आलेल्या डॉक्टरांनी सीताराम हा मृत असल्याचे सांगितले.

    बळीराजा संकटात, माय-भगिनींचे अश्रू पुसायचेत; नवी मुंबईत एकनाथ शिंदेंचं भाषण

    सीताराम वीर यांचा आकस्मिक मृत्यू झाला, तरी याची कोणतीही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. सीताराम वीर यांना दारुचं व्यसन होतं, त्यामुळे यातूनच त्यांचा मृत्यू झाला असा काहीसा समज घरच्यांचा झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना न देता अंत्यविधी उरकण्यात आला होता.
    Maharashtra TimesPune Crime : नऊ महिन्यांच्या बाळाची आई… वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय, सासू-नणंदेबाबत म्हणाले…
    दुर्वास पाटील आणि त्याचा बाप दर्शन पाटील यांच्या सांगण्यांनुसार ज्या रिक्षा चालकाने सीताराम वीर यांना घरी सोडलं, त्या रिक्षा चालकाला दुसऱ्या दिवशी घरी बोलावून घेतलं. कालच्या भाड्याची विचारणा केली, त्या रिक्षा चालकाने कालचे भाडे 150 रुपये झाल्याचे सांगितले, त्याप्रमाणे हे भाडे रिक्षा चालकाला देण्यात आलं. या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी अधिक तपास करत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा