• Fri. Mar 6th, 2026
    माझं बरंवाईट झाल्यावरच मुख्यमंत्री मला योग्य संरक्षण देतील; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंसह सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ज्याने माझी गाडी जाळली त्याचा जरांगेच्या लोकांनी सत्कार केला. मुख्यमंत्रीच हल्ले करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतात का? माझं बरंवाईट झाल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला योग्य संरक्षण देतील.राज्यात पोलिसांचा धाक नाही, 96 कोळी मराठा असे करूच शकत नाहीत. माझी गाडी जाळणाऱ्याला पोलीस काही वेळात अटक करतात आणि लगेच सोडतात. हा कुठला न्याय गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज असंही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed