• Fri. Jun 12th, 2026

    OBC नेत्यांच्या पाठीशी उभे राहा, इतकं लिहून तरुणाने जीव दिला, आरक्षणाच्या निर्णयाने झालेला हताश

    OBC नेत्यांच्या पाठीशी उभे राहा, इतकं लिहून तरुणाने जीव दिला, आरक्षणाच्या निर्णयाने झालेला हताश

    Beed Youth Ends Life: मराठा आरक्षणाच्या निर्णयाने हताश झालेल्या एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. कुटुंब देवदर्शनाला गेलेलं असताना या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड: बीड येथील रहिवाशी असलेल्या राहुल पतंगे (35 वर्षे) नावाच्या युवकाने बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड येथील पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

    या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राहुल पतंगे या युवकाने मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल पतंगे यांनी बीड शहरातील खंडेश्वरी परिसरात झाडाला गळफास घेतला. या परिसरात काही युवकांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने त्यांनी तात्काळ पेठ बीड पोलीस ठाण्यात माहिती दिली.
    Maharashtra TimesBeed Flood: माझं लेकरु गेलं; बीडमध्ये डोळ्यादेखत पोरगा पुरात वाहून गेला, आईचा काळीज धस्स करणारा आक्रोश
    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाला खाली उतरवण्यात आलं. यावेळी मयत राहुल पतंगे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्याने ‘ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभे राहा,’ असं लिहिले असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी युवकाने हाताश होऊन गळफास घेत आपले प्राण त्यागाले असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

    राहुल पतंगे याचे कुटुंबीय देव दर्शनासाठी नाशिक येथे गेले असल्याने तो एकटाच घरात होता. राहुल पतंगे हा कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई-वडील असा परिवार आहे. राहुल याची घरची गरीब परिस्थिती, त्यात आता ओबीसी आरक्षण राहणार नाही, असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

    सध्या त्याच्या घरचे लोक अद्याप नाशिक येथून आले नसल्याने पोलिसांनी त्याच्या मृतदेहास रुग्णालयात ठेवले आहे. तोवर या विषयी फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवाराने माध्यमांशी बोलताना त्याने हे टोकाचे पाऊल केवळ आरक्षणाच्या मुद्यावर उचलले असल्याचे सांगितले आहे. याचा पुढील तपास पेठ बीड पोलिस करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा