• Tue. Jun 9th, 2026
    Washim News : आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत

    Washim Child Dies After Falling into Drain : वाशिम जिल्ह्यातील गोंडेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आळी आहे. मामाच्या गावाला गेलेल्या 4 वर्षीय स्वराजचा नाल्यात पडून मृत्यू झाला आहे.

    वाशिम गोंडेगाव नाल्यात पडून मुलाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील गोंडेगाव परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली असून आईसोबत मामाच्या गावाला गेलेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Washim Child Dies After Falling into Drain)

    वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. गोंडेगावातही जोरदार पाऊस पडल्याने गावातील नाले तुडूंब भरून वाहत होते. हिंगोली जिल्ह्यातील जामठी गावातील स्वराज आपल्या आईसोबत गोंडेगाव येथे मामाकडे आला होता. सकाळच्यावेळी त्याच्या आईने अंगणात त्याला अंघोळ घातली आणि आई घरात गेली तेवढ्यात स्वराज अशोक खिल्लारे हा 4 वर्षीय चिमुकला नालीत पडला आणि काही अंतरावर वाहून गेला, त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    Maharashtra TimesPune Politics : शिंदेंच्या शिवसेनेने पुण्यात कंबर कसली, महापालिकेआधी मोठा गेम, महायुतीतीलच इच्छुक आमनेसामने

    स्वराज अंगणात दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्याचा शोध लागला नाही. ज्या नालीत तो वाहून गेला त्या नालीवर रापटा नसल्याने तो नालीत वाहून गेला असा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानंतर काही अंतरावरील नाली जेसीबीच्या साहाय्याने खोदून नाल्यातील मोठा पाईप बाजूला काढला असता त्याचा मृतदेह वाहून बाहेर आला. स्वराज नाल्यात पडला आणि पुढे जाऊन पाईपात अडकला त्यामुळे श्वास घेता न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून यासाठी दोषी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी मृत स्वराज खिल्लारेच्या कुटुंबियांनी केली आहे.

    Maharashtra TimesAhilyanagar Crime : आई-वडील विभक्त, चारही बहिणींना नातेवाईकांकडे सांभाळायला दिलं; नराधाम दाम्पत्याकडून संतापजनक कृत्य

    स्वराजच्या वडिलांनी मुंबईवरून मोटारसायकलनं गाठलं गाव

    स्वराजचे वडील मुंबईमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वराज मामाकडे आलेला असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळली. घटना घडण्याच्या वेळेत मुंबईवरून वाशिमकडे येण्यासाठी ट्रेन किंवा बस नव्हती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मुंबई वरून 600 कि.मी मीटरचा प्रवास दुचाकीवरून करून गाव गाठलं. लेकाला मृतावस्थेत बघून बापाने एकच आक्रोश केला. त्यानंतर स्वराजवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा