Chandrashekhar Bawankule : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं काय-काय चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आले, याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या मराठ्यांची जात कुणबी म्हणून नोंद आहे त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. पण सरकारच्या या जीआरवर ओबीसी नेते नाराज झाले आहेत. ओबीसी नेत्यांकडून या जीआर विरोधात भूमिका मांडली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर थेट हायकोर्टात जीआरला आव्हान देण्याचं ठरवलं आहे. या दरम्यान ओबीसी उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“हैदराबाद गॅझेटनुसार जे जात प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देताना कोणत्याही खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ते जात प्रमाणपत्र दिलं जाऊ नये, अशी काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबद्दल बैठकीत चर्चा झाली”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत काही दाखल्यांचे पुरावे दाखवले. त्यामध्ये खाडाखोड करुन कागदपत्रांमध्ये कशी मोडतोड होते आणि जात प्रमाणपत्र मिळवली जात आहेत याबाबत माहिती दिली. त्यामुळे या बैठकीत ठरलं की, जात प्रमाणपत्र देताना ते चुकीच्या दाखल केलेल्या कादपत्रांच्या आधारावर दिलं जाणार नाही याची काळजी घ्यावी, असा आदेश अधिकाऱ्यांना द्यावे”, असं बैठकीत ठरल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
“खरंतर हे नियमांनी आहे. जिथे मराठा कुणबी, कुणबी मराठा आहे तिथे आक्षेप नाही, अशीदेखील चर्चा झाली. आमच्या ओबीसी मंत्रालयाला जवळपास 2900 कोटी रुपयांचं बजेट आहे. ती रक्कम ओबीसी मंत्रालयाला मिळाली पाहिजे. ओबीसींचे जवळपास 22 उपमहामंडळ आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ओबीसी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयात सादर केले पाहिजेत, अशी चर्चा झाली. काही पदांचे अनुशेष आहे तो अनुशेष भरावा, असा प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा झाली. सर्वच विषय नियमात बसणारे आहेत. ओबीसी मंत्रालयातून चालणाऱ्या योजना बंद पडू नये, अशी चर्चा झाली”, अशीदेखील माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा