• Sun. Jun 7th, 2026
    खासदार प्रणिती शिंदे आयुक्तांवर भडकल्या, म्हणाल्या, ‘मला आत्ताच्या आता…’

    सोलापुरात अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनंतर सोलपुरात झालेल्या अवस्थेवरुन खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना जाब विचारला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान खान, सोलापूर : अतिवृष्टीमुळे सोलापूरकरांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीचा जबर फटका बसला आहे. कधीच सोलापूर शहर इतक्या मोठ्या प्रमाणात तुंबले नव्हते. आत्ताच कसं काय तुंबले? असा जाब विचारत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदें महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडून बसल्या होत्या. नॅशनल हायवेला चिटकून असणाऱ्या नागरी वसाहतीत पावसाचे पाणी शिरले असा अहवाल पालिका आयुक्तांनी दिला होता. त्यावर खासदार प्रणिती शिंदें पालिका आयुक्तांना सांगितले, यात नॅशनल हायवे प्राधिकरणचा काहीही संबंध नाहीय. सर्व दोष महानगरपालिका प्रशासनाचा आहे. याचं उत्तर मला द्या, असा जाब विचारत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदें भडकल्या.

    खासदार प्रणिती शिंदे यांनी यानंतर माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील टीका केली आहे. “पालकमंत्री फक्त शहरापूरते नाहीत. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्हाभरात शेतकऱ्यांच मोठं नुकसान झाले आहे. त्याकडे देखील लक्ष द्या”, असे सांगत प्रणिती शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले आहे.

    सकाळी जयकुमार गोरे तर दुपारी प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

    सोलापूर शहरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेळगी, मित्र नगर, सोरेगाव, विडी घरकुल, दहिटने आदी भागात असलेल्या नागरी वसाहतीना बसला आहे. सर्वसामान्य नागरीक राहत असलेल्या अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरी वसाहतीत जाऊन पाहणी केली. तर दुपारी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली.

    प्रणिती शिंदे यांची पालकमंत्र्यांवर टीका

    “सोलापूर शहरात अतिवृष्टी झाली. येथील राजकीय मंडळी ताबडतोब पाऊस थांबल्यानंतर मदतीला जायला पाहिजे होते. पालिकेचे काही अधिकाऱ्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला.पालकमंत्री मात्र 24 तासानंतर सोलापुरात येतात आणि एका विधानसभा मतदारसंघा पुरता दौरा करतात हे चुकीचे आहे.पालकमंत्री हे संपूर्ण जिल्ह्याचे असतात, त्यांनी जिल्हाभरात दौरे करायला पाहिजे”, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा