उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्याचं बोललं जातंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली असा आरोपही केला जातोय. यावर शशिकांत शिंदे यांनी अकोल्यात माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. लोकांमध्ये संशय निर्माण करून राजकारण करण्याचा डाव असल्याचे शिंदे म्हणाले. आमची मतं फुटली नसून भाजपचीच मतं फुटली असावीत असा पलटवारही त्यांनी केला.