Govind Barge Death Case : सोलापूर जिल्ह्यातील सासुरे येथे बीडच्या उपसरपंचाने गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या दिसत असली तरी, घातपाताचा संशय व्यक्त केला जाा आहे. यातच आता त्यांच्या भाच्याने गेल्या 6 महिन्यांत घडले ते सर्व सांगितलं आहे.
मृत बर्गे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्या भाच्याने एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताा मोठे खुलासे केले आहेत, ज्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. तो म्हणाला, ‘माझ्या मामाकडे पिस्तूल नव्हते, तो निर्व्यसनी होता. गाडीत सापडलेल्या दारूच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. आमच्या मामाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’
Solapur Crime: दीड वर्षांपूर्वी नर्तिकेच्या प्रेमात, लाखो उडवले; तिच्याच घरासमोर जीव दिला, माजी उपसरपंच प्रकरणाची INSIDE STORY
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ‘गेल्या सहा महिन्यांपासून बर्गे मानसिक तणावात होते. पूजा गायकवाडकडून त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचेही त्यांनी सांगितले. प्लॉट नावावर करून द्यावा, अशी मागणी त्यांच्याकडून वारंवार केली जात होती. राजकारण्यांनीच ही ओळख करुन दिली. केवळ पैशासाठी संबंध जोडण्यात आले,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. बर्गे यांनी गायकवाड हिला सोन्याचे दागिने व महागडा मोबाईल गिफ्ट केला होता. एवढेच नव्हे तर, गेवराईतील आलिशान घर देण्याची मागणीही करण्यात आली होती. ‘या घरामुळेच का मृत्यू घडवून आणला गेला का?’ असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
उपसरपंचाच्या कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘राजकीय संबंधातूनच त्यांची ओळख नर्तिकेशी करून देण्यात आली. त्यामुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. बर्गेंच्या भाच्याने त्यांचा मागील काही महिन्यांतला घटनाक्रम सांगितला आहे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले.
गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता.

