Pune News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जनावेळी महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दगडूशेठ गणपची मंदिराजवळ ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित पत्रकार गणेश विसर्जन मिरवणुक असल्याने बेलबाग चौक येथे मी माझ्या न्युज चॅनेलचे कामाच्या अनुशंगाने आले होते. दिवसभर मिरवणुकांमध्ये होते, काम संपल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यासह ते दगडुशेठ गणपती मंदिरामध्ये जावुन दर्शन घेतले. दर्शन घेऊन त्यांची गाडी पासोड्या विठ्ठल मंदिराजवळ पार्क केलेली होती. मात्र गाडीकडे जात असताना सव्वासातच्या सुमारास त्रिताल ढोल ताशा पथकाची लोखंडी ट्रॉलीचे चाक पायावर घातले, त्यावेळी महिला पत्रकाराने विचारणा केली असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. इतकंच नाहीतर मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सोबत असणाऱ्या सहकाऱ्याने विचारणा केल्यावर त्याला ढकलुन त्याचा चष्मा पाडून फोडुन नुकसान केले, त्यावेळी त्याच्याच पथकातील एका व्यक्तीने मला आणि माझ्या सहकारी मित्राला यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
Pune Gang War : आयुष कोमकरची बॉडी तीन दिवसांपासून ससूनमध्येच का? दोन कारणं समोर, दुसऱ्याचं कनेक्शन थेट वनराज मर्डरशी
या घटनेवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे. पुण्यातील ढोल पथकांकडून वृत्तपत्र छायाचित्रकारांना धक्काबुक्की आणि महिला पत्रकारांचा केलेल्या विनयभंगाप्रकरण व ढालपथकातील सदस्यांचा खुलासा आयुक्त अमितेश कुमार यांना यांना पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत काय कार्यवाही झाली आहे यावर विचारणा केली आहे. यावर मला लवकरच ऊत्तर अपेक्षित असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
पुणेकरांचा प्रवास आता सुस्साट होणार, एक तासाचं अंतर ५ ते १० मिनिटांत कापलं जाणार; कुठे-कसे असणार मार्ग?
दरम्यान, संबंधित ढोल पथकामधील सदस्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. जर महिला पत्रकारांना गणेशोत्सवावेळी अशा प्रसंगांना सामोर जावं लागत असेल तर महिलांच्या सुरक्षिततेचं काय? पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे.

