• Thu. Mar 12th, 2026

    मुंबईत 34 मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी, पोलिसांनी नोएडातून मुसक्या आवळल्या, ज्योतिषी असल्याचा दावा

    मुंबईत 34 मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी, पोलिसांनी नोएडातून मुसक्या आवळल्या, ज्योतिषी असल्याचा दावा

    Mumbai News : मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ऐन अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर देण्यात आला होता. मुंबईत 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्ब पेरण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याच्या धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले. त्यानंतर नोएडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    आरोपी बिहारचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो नोएडामध्ये राहत आहे. मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.आरोपीने शहरात अनेक ठिकाणी 34 गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. तब्बल चारशे किलो आरडीएक्स वापरून मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाईल, असेही म्हटले होते.

    वाहतुकीबाबत तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने व्हाट्सअप क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर गुरुवारी एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. 14 पाकिस्तानी भारतात घुसले असून, मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात येणार आहे. यासाठी 400 किलो ‘आरडीएक्स’चा वापर करण्यात आला असून, सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा या संदेशात करण्यात आला आहे.

    Lalbaugcha Raja Visarjan 2025 LIVE : लालबागच्या राजाची मिरवणूक, पहा लाइव्ह | Mumbai Ganpati Darshan

    Maharashtra TimesPune Crime : वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी, काय काय घडलं?
    अश्विनी असे नाव असेल्या आरोपीला नोएडा सेक्टर-113 मध्ये पकडण्यात आले आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने स्वतःला पाकिस्तानमधील जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले होते. अनेक पाकिस्तानी दहशतवादी शहरात घुसल्याचा दावा केला होता. सुरुवातीला त्याने स्वतःला ज्योतिषी असल्याचे म्हणवले आहे. परंतु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    Maharashtra TimesPratap Sarnaik : मोदींच्या आदेशाला सरनाईकांकडून केराची टोपली, टेस्ला कार खरेदीनंतर विरोधक तुटून पडले, काळ्या पैशावरुनही टीका
    मुंबईत गणेशोत्सव अंतिम टप्प्यात असताना ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी देण्यात आल्याने गांभीर्य अधिकच वाढले. परंतु सुदैवाने विघ्नहर्त्याने संकट दूर सारत उत्सवाचा शेवट गोड केला आहे.

    मुंबई पोलिसांनी धमकी गांभीर्याने घेत शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली होती. महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी सुरु आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितलेले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा