Nashik Pilgrimage : नाशिकला अधिकृत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्र्यंबकेश्वरला ‘अ’ दर्जानंतर, नाशिकसाठी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याची मागणी संत समुदायाने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय स्तरावर जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी साधू-महंतांकडून केली जात आहे
गोष्ट ‘राजा’च्या ‘किमती’ नैवेद्याची! नांदगावात बैलाच्या पोटात गेली सोन्याची अंगठी, काही केल्या निघेना शेवटी…
तपोवनात आखाड्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधू-महंतांशी चर्चा केली. या बैठकीत साधूंनी हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी केली. हरिद्वारला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने तेथे धार्मिक स्थळांचे संरक्षण, अतिक्रमण रोखणे आणि भाविकांसाठी सुविधा वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिकसाठीही हा दर्जा मिळावा, असा आग्रह धरण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावात नाशिकच्या धार्मिक महत्त्वाचे वर्णन, कुंभमेळ्याचा इतिहास आणि भाविकांच्या संख्येच्या आधारावर शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. सन २०१५ चा कुंभमेळा पार पडल्यापासूनच नाशिकला तीर्थाचा दर्जा मिळण्याची मागणी प्रलंबित आहे.
नाशिककरांसाठी महत्त्वाचे! गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे ‘या’ रस्त्यांवर 15 तास ‘नो एन्ट्री’; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्वाचे स्थान आहे. युगानुयुगे नाशिक क्षेत्राची धार्मिक महती मोठी आहे. सिंहस्थाअगोदर तरी नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळायला हवा – पं. शांतारामशास्त्री भानोसे, स्मार्तचूडामणी
तीर्थक्षेत्र दर्जाबाबत संतांच्या मागणीस जिल्हा प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, यात सुधारणा करून नाशिकला हरिद्वारच्या धर्तीवर दर्जा मिळण्याची मागणी केली आहे. प्रस्तावात अपेक्षित सुधारणा करण्यात येत आहेत – माधवदास महाराज राठी, पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद
मेंढपाळांचा अपमान चालणार नाही, आरोपींना तातडीने अटक करा; एसपी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा
तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास फायदे काय ?
घाट आणि मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढली जातील
हरिद्वारप्रमाणे कठोर नियम लागू होऊन धार्मिक स्थळांचे संरक्षण होईल
तीर्थक्षेत्राच्या मुख्य भागात मद्य दुकाने आणि मांस विक्रीवर निबंध वेईल
हॉटेल्स आणि निवासस्थाने भक्तनिवास म्हणून विकसित केली जातील
पर्यटनाच्या नावाखाली व्यावसायिक शोषण रोखले जाईल
गोदावरीच्या घाटांची स्वच्छता, दुरुस्ती केली जाईल
कायमस्वरूपी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारली जाईल

