गणपती बाप्पा गेल्या आठ दिवसांपासून घराघरात विराजमान झालाय. पण आता गणपती बाप्पाचा निरोप घ्यायची वेळ जवळ येत आहे. येत्या 6 सप्टेंबरला गणपती बाप्पाच्या निरोपासाठी मोठी गर्दी रस्त्यावर येईल. अशा परिस्थितीत भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहावे यासाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत.
गणपती मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात वाहतुकीत मोठे बदल, नेमक्या कोणत्या रस्त्याने प्रवास करायचा?
