B. G. Kolse Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षण यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळला, मात्र आता यावरून अनेक अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त करताना फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. माजी न्यायमूर्तींनी शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. नेमके काय म्हणाले जाणून घ्या.
आजचा जीआर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पुसलेली पान आहेत, असं मतं माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मी १००% खरं बोलून टिकेचा धनी व्हायला तयार आहे. डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय हे मला आता समजलं. इतक्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं? मी जरांगे पाटलांना फोन करून रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करत नाहीत, यामध्ये तुझ्याही तब्येतीचं नुकसान होईल आणि मराठ्यांचा देखील अतोनात नुकसान होणार आहे. आज जे सरकारने तुम्हाला कबूल केला आहे ते कायद्याच्या कोणत्याच कसोटीमध्ये बसणार नाही. हा जीआर पाहून मी हतबल झालो. असं बी जी कोळसे पाटील म्हणाले आहेत.
Maratha Reservation : ‘मी मनोजदादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळं गुंडाळलं होतं’, असीम सरोदे यांनी सांगितलं काल नेमकं काय घडलं
फक्त बी.जी कोळसे पाटीलच नाही तर मराठा राज्य समन्वयक योगेश केदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी देखील अशाच पद्धतीचा संशय या सरकारच्या जीआर वर व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा युद्धात जिंकलो मात्र तहात हरलो अशी भावना निर्माण व्हायला लागली आहे.
Maratha Reservation GR: जरांगे पाटलांचा विजयी गुलाल, छगन भुजबळांनी सुरू केल्या हालचाली; पडद्याआड काय घडतंय?
काल ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीचा जल्लोष नवी मुंबई या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केला होता. मात्र, त्यानंतर मराठा समाजाची घोर निराशा झाली होती आणि आरक्षण आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करावा लागला होता. आता देखील सरकारने पूर्ण केलेल्या मागण्या आणि दिलेल्या आश्वासना संदर्भात सुद्धा मराठा समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे.

