Nagpur Student Murder Case: नागपुरात एका अल्पवयीन विद्यार्थिनीची अल्पवीन मुलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, मात्र, काही दिवसांपासून ही विद्यार्थिनी त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं. त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती आहे.
मृत विद्यार्थिनी ही सेंट अँथनी स्कूल, गुलमोहर नगर येथे दहावी इयत्तेत शिकत होती. आरोपी देखील अल्पवयीन असून तो इमामवाडा परिसरात राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून आरोपी आणि मृत विद्यार्थिनी यांच्यात ओळख आणि प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थिनीने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं. यामुळे संतप्त होऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मुलाला जन्म दिला, 15 मिनिटांनी बेशुद्ध पडली, पती डॉक्टरांकडे विनवण्या करत राहिला पण… उपचाराअभावी महिलेचा मृत्यू
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (29 ऑगस्ट) दुपारी सुमारास तीन वाजताच्या दरम्यान एंजल शाळा सुटल्यावर ही विद्यार्थिनी बाहेर आली. त्याचवेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, मुलीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्याशी वाद घातला. त्यानंतर अचानक त्याने चाकू काढला आणि तिच्यावर एकामागून एक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली विद्यार्थिनी जमिनीवर कोसळली आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
शाळेच्या परिसराबाहेरच ही धक्कादायक घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या प्राचार्यांनी तात्काळ अजनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमी अवस्थेतील विद्यार्थिनीला सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
Jalna Accident: नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली, पाच जणांचा मृत्यू, जालन्यात भीषण अपघात
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. क्राईम ब्रांच आणि अजनी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या पथकांची स्थापना केली असून तो अद्याप फरार असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या निर्घृण हत्येमुळे कायदा व सुव्यवस्था, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

