Nashik Minor Girl ends life : तिघांच्या छळास कंटाळून पीडितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आई-वडिलांना तिघांच्या जाचाबद्दल माहिती दिली होती.
गणेश माणिक भांगरे (वय २०), अक्षय मदन वरठे (वय २१, दोघे रा. रामटेकडी झोपडपट्टी, तपोवन) व अतिष राजकुमार वैद्य अशी तिघा संशयितांची नावे आहेत. त्यातील गणेश व अक्षय यांना अटक करण्यात आली आहे, तर वैद्य पसार झाला आहे.
तिघांच्या छळास कंटाळून पीडितेने २ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पीडितेने आई-वडिलांना तिघांच्या जाचाबद्दल माहिती दिली होती.
Pune News : सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर चार दिवसांनी दरीजवळ सापडला, नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना संशयित भांगरे तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. २८ फेब्रुव्रारीपासून त्याने व वरठे यांनी युवतीच्या महाविद्यालयात येऊन वारंवार पाठलाग केला. यानंतर, भांगरेशी प्रेमसबंधासाठी दोघांनी बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला.
मुंबई क्रिकेटचा इतिहास, आठवणी सांगितल्या….सुनील गावस्करांसमोर शरद पवारांचं जबरदस्त भाषण
याचदरम्यान तिचा नातलग असणाऱ्या वैद्यनेही पीडितेचा इन्स्टाग्राम आयडी व पासवर्ड मिळविला. त्याआधारे ‘तिचे व माझे प्रेमसंबंध आहेत, आम्ही रिलेशनमध्ये आहोत’, असे भासवून तसे बनावट फोटो तिच्याच आयडीवरून अक्षय वरठे याच्या इन्स्टा आयडीवर पाठविले. त्यामुळे भांगरे चवताळला आणि त्याने शिवीगाळ केल्याने युवती अधिक खचली होती.
Crime News : तू बाहेर आली नाहीस, तर… रात्री कॉल करुन 15 वर्षीय मुलीला शेतात नेलं, 28 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, अखेर…
चार वर्षांत ४९१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
दरम्यान, मुलांसाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षणपद्धती विकसित करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर सुरू असतानाच, ‘आयसी-३’ या संस्थेने ‘कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’च्या (सीआयएससीई) सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात देशातील उच्च माध्यमिक स्तरातील विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जगत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, २०१९ ते २०२३ या कालावधीत ४९१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. शैक्षणिक ताणतणाव, करिअर मार्गदर्शनाचा अभाव, झोप अस्थिर असणे, नकारात्मक विचार येणे, या बाबी शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात अडथळा आणत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

