• Wed. Jul 1st, 2026

    शिंदे-फडणवीसांमध्ये वाद? बच्चू कडूंनी बोटांवर समजावून सांगितलं गणित

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    शिंदे-फडणवीसांमध्ये वाद? बच्चू कडूंनी बोटांवर समजावून सांगितलं गणित

     छत्रपती संभाजीनगर 
    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहेच”, असं म्हणत हाताच्या दोन बोटांवर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू ंनी सगळं गणित समजावून सांगितलं. “सध्याची परिस्थिती पाहता भाजपाला राज्यात संख्याबळाची गरज नाही. संख्याबळाची गरज केंद्रात आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांची केंद्रात ताकद आहे? त्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांचं नाव येतं. उद्या केंद्र सरकारमधून नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू गेले तर महाराष्ट्रातील हे दोघे तयार आहेत. त्यामुळे काय होणार हे सांगायची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. नगररचना विभागाच्या कामावरून फडणवीस शिंदेंवर नाराज असल्याचे प्रश्नावर बच्चू कडू बोलत होते.राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठकीच्या अनुषंगाने बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये होते. सुभेदारी विश्रामगृह येथे पार पडलेल्या शेतकरी हक्क बैठकीला राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर, अजित नवले, आमदार कैलास पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

    नगररचना विभागाच्या कामावर फडणवीस नाराज असून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहे का? असा प्रश्न माध्यमांनी बच्चू कडूंना विचारला. त्यावर कडू यांनी प्रतिक्रिया दिली. “हो तो आहेच. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याची केंद्रात अधिक ताकद आहे. अजित पवार, एकनाथ शिंदेंची संख्या लोकसभेत कमी आहे. मात्र राष्ट्रवादीचे शप अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांची ताकद आहे. भारतीय जनता पक्षाला संख्याबळाची राज्यात गरज आहे की केंद्रात? उत्तर हे केंद्रात आहे. राज्यात कुणाची गरज नाही. केंद्रात सरकारमधून नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू गेले तर हे दोघे तयार आहे. त्यामुळे काय होणार सांगायची गरज नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

    ‘दादागिरी दाखवावी,दादासमोर दादा लावावं की आणखी काही…’

    “विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारने कर्जमाफी करण्याचा आश्वासन दिलं होतं. उपमुख्यमंत्री अजित दादा गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्जमाफीबाबत बोलत आहेत. कर्जमाफी होईल असं वाटतं का? विचारताच बच्चू कडू म्हणाले, अजित दादांनी दादागिरी दाखवली पाहजे. दादा विसरलोच आम्ही. दादा समोर दादा लावावं की आणखी दुसर लावावं हे समजत नाहीये”, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed