• Thu. Mar 12th, 2026
    कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की संसाराची माती झाली, आधी पत्नीला संपवलं अन् स्वत:च्याही आयुष्याची दोर कापली

    Jalna Crime News : भोकरदन तालुक्यातील पारध गावात येथे एका व्यक्तीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    संजय आहेर, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे शनिवारी मन हेलावणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने सारा परिसर हादरला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे.

    समाधान अल्हाट (वय अंदाजे ३०) यांनी पत्नी कीर्ती (वय अंदाजे २५) यांचा पाच वर्षांपूर्वी झाला होता. दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगी व पाच वर्षांचा मुलगा अशी दोन लहान अपत्ये आहेत. काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये भांडणं सुरू होती. कीर्ती काही दिवसांपूर्वी माहेरी वसई, ता.सिल्लोड येथे गेली होती. समाधान अल्हाट याने तिला पाच-सहा दिवसांपूर्वी जबरदस्तीने पुन्हा घरी आणल्याचे समजते. त्यांनी पत्नीचा जीव घेतला, तर स्वत:च्या आयुष्यचीही दोर कापली. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    समाधान किर्तीसोबत सतत वाद घालत होता. कालपोळ्याच्या सणाच्या दिवशी देखील त्याने पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली होती. हे संपूर्ण प्रकरण कीर्तीने आपल्या आईला देखील याबद्दल सांगितले होते. आज कीर्तीची आई दुपारी पारध येथे आले असता तिला हा सगळा प्रकार लक्षात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पारध परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोन बालकांचे भवितव्य अंधारात ढकलले गेल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पारध पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. भोकरदनचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांनी प्रकरणाच्या तपासाबाबत सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याच्या खोळद गावात पोळ्याच्या सणादिवशी दुर्दैवी घटना घडली. बैलांना चारण्यासाठी व अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पिढी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे. बैल पोळ्याच्या बहराच्या सणादिवशीच तरुणावर काळाचा घाला पडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा