Chhatrapati Sambhajinagar Youth ends life : आजारपणाला कंटाळून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय झालं नेमकं?
या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा सदानंद नगर येथे कुटुंबासह राहत होता. त्याचे वडील सुरक्षारक्षक आहेत. तो विवाहित असून त्याला तीन वर्षाची मुलगी देखील आहे. रितेश याला पाच वर्षापासून एका आजाराने ग्रासले होते. दीर्घ काळापासून चालत आलेल्या आजारपणाला तो कंटाळलेला होता. रितेशने आत्महत्या करण्याचा विचार नातेवाईकांकडे बोलूनही दाखवला होता, त्यावर अनेकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो अयशस्वी ठरला.
Crime News : श्वेता, मला होकार का देत नाहीस? चिडलेल्या युवकाने गाडी तलावात घातली, तरुणीचा बुडून मृत्यू आणि…
घरात कुणी नसताना गळफास
रितेशची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली होती, तर वडील सुरक्षारक्षक असल्याने ते कामावर गेले होते. वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी दार वाजवले, मात्र कुठलाही प्रतिसाद आला नाही. वडिलांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक निर्मला राख या घटनास्थळी दाखल झाल्या. घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता रितेशने गळफास घेतला होता. त्याला तात्काळ खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
बीडमध्ये नशामुक्ती जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा, नवनीत काँवतांनी लक्ष वेधलं, नागरिकांना दिली शपथ!
Crime News : गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट, CA च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला
काही वर्षांपूर्वी रितेशच्या भावाचा मृत्यू झाला होता तर सहा महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा निधन झालं. या दुःखद घटनांमधून कुटुंब सावरत नाही तोच रितेशने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

