• Sat. Mar 7th, 2026
    Jalgaon News : विजेच्या धक्क्याने लेकरा-बाळांसह पाच जणांचा अंत, मृतदेह नेताना रुग्णवाहिका बंद, दोर बांधून रुग्णालयापर्यंत

    Jalgaon Five People Died due to Electric Shock : जळगाव जिल्ह्यातील वरखेडी येथे आज संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना घडली. शेतात काम करताना तारेच्या कुंपणाला असलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला. या घटनेनं अख्खं जळगाव हळहळलं आहे.

    विजेच्या धक्क्याने पाच जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील वरखेडी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा शेतातील विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्यू झाला. मृतांमध्ये आजी, पती-पत्नी, दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्व मजुरीसाठी शेतात आले होते. सर्व मृत मध्य प्रदेशातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पिकांचं प्राण्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्याने कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता. शेतमालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे या सर्वांचे मृतदेह जेव्हा रुग्णालयात नेण्यात येत होते, तेव्हा अर्ध्या रस्त्यात रुग्णवाहिका बंद पडली.

    नेमकं काय घडलं?

    जळगावमधील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावाजवळील शेतात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या पाच जणांमध्ये दोन लहान लेकरांचा देखील समावेश आहे. या घटनेदरम्यान एक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे, पाचही जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा रुग्णालयात आणत असताना रुग्णवाहिका जळगाव शहरातील खोटे नगरजवळ अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या एका रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोठा दोर बांधून मृतदेह असलेली बंद पडलेली रुग्णवाहिका जळगावच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आली. जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर मृतदेह उतरविण्यात आले. एवढ्या मोठ्या घटनेतील मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका बंद पडल्याच्या या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
    Maharashtra TimesCrime News : मॉर्निंग वॉकला जाताना अडवलं, मानेवर अन् पोटावर सपासप वार, काँग्रेसच्या नेत्याला भररस्त्यात संपवलं

    दरम्यान, शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये आलेल्या विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. या घटनेमध्ये शेतमालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    Maharashtra Times50 खोके म्हणताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्या अन्.., विरोधकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध

    मृतांची नावं

    मृत्यू झालेल्यांमध्ये विकास रामलाल पावरा (वय ३५), त्याची पत्नी सुमन विकास पावरा (वय ३०), तसेच त्यांची २ मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा तसेच वृद्ध महिला (नाव निष्पन्न नाही) यांचा समावेश आहे. तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) ही घटनेतून बचावली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा