Jalgaon Five People Died due to Electric Shock : जळगाव जिल्ह्यातील वरखेडी येथे आज संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना घडली. शेतात काम करताना तारेच्या कुंपणाला असलेल्या विजेच्या ताराचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला. या घटनेनं अख्खं जळगाव हळहळलं आहे.
नेमकं काय घडलं?
जळगावमधील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावाजवळील शेतात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या पाच जणांमध्ये दोन लहान लेकरांचा देखील समावेश आहे. या घटनेदरम्यान एक प्रकार उघडकीस आला तो म्हणजे, पाचही जणांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून जळगाव जिल्हा रुग्णालयात आणत असताना रुग्णवाहिका जळगाव शहरातील खोटे नगरजवळ अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या एका रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोठा दोर बांधून मृतदेह असलेली बंद पडलेली रुग्णवाहिका जळगावच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आली. जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचल्यानंतर मृतदेह उतरविण्यात आले. एवढ्या मोठ्या घटनेतील मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका बंद पडल्याच्या या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
Crime News : मॉर्निंग वॉकला जाताना अडवलं, मानेवर अन् पोटावर सपासप वार, काँग्रेसच्या नेत्याला भररस्त्यात संपवलं
दरम्यान, शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये आलेल्या विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. या घटनेमध्ये शेतमालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
50 खोके म्हणताच आमदारांच्या पत्नी अंगावर धावल्या अन्.., विरोधकांकडून काळे झेंडे दाखवत निषेध
मृतांची नावं
मृत्यू झालेल्यांमध्ये विकास रामलाल पावरा (वय ३५), त्याची पत्नी सुमन विकास पावरा (वय ३०), तसेच त्यांची २ मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा तसेच वृद्ध महिला (नाव निष्पन्न नाही) यांचा समावेश आहे. तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) ही घटनेतून बचावली आहे.

