Heavy Rains in Thane : ठाण्यात मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक भागांसह मुंब्रा, दिवा येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, तसंच पनवेलमधूनही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६१ बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने २०४ नागरिकांचे संक्रमण शिबिरात स्थलांतरण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. कल्याण-डोंबिवली शहरात दिवसभरात ७० मिमी पावसाची नोंद झाली. काटई परिसरात ११ गाळे आणि १० घरांमध्ये पाणी शिरले. नांदिवली येथील साई कमल सोसायटीतील १६ घरे पाण्याखाली गेली. काटेमानिवली, शिवाजी नगर, वालधुनी परिसरात १२ घराममध्ये, भोपर येथे नाल्याचे पाणी चाळीत शिरून १० घरांचे नुकसान झाले.
Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर ओसरणार, मात्र हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट; उद्या कशी असेल परिस्थिती?
काटेमानिवली येथील वृंदावन शिवकृपा चाळ, महालक्ष्मी शॉपिंग सेंटरमधील सात घरांत पाणी शिरले. चीकणघर, वालधुनी अशोकनगर परिसरातील सहा घरांमध्ये पाणी शिरले. ठाणकर पाडा येथे घराची भिंत कोसळली. उल्हास नदीवरील पूल, दहागाव येथील चंद्रानदीवरील पूल आणि वालकस येथील नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. नेतिवली टेकडीवर घरावर झाड कोसळल्याने १२० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. समतानगर, अहिरे गावातील ७०, काटेमानिवलीतील १० तर शिवाजीनगर वालधुनी परिसरातील चार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
Local Train : मुंबईत मुसळधार पावसाचा रेल्वेवरही परिणाम, आठ तासांनंतर धावली लोकल; प्रवाशांना मनस्ताप, आज ११ एक्सप्रेस रद्द
भिवंडीत स्थलांतर
भिवंडी शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत १२६ मिमी पावसाची नोंद झाली असून शहरामध्ये काकूबाई चाळ, हंडी कंपाऊंड, आजमी नगर, संगमपाडा, म्हाडा कॉलनी येथे पाणी साचले. हंडी कंपाऊंड येथील चार कुटुंबांना स्थलांतरीत केले. शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असूनही कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती पालिकेने दिली.
‘मोनो ‘मध्ये ५८२ प्रवासी कोंडले! गर्दीमुळे अतिभार, वीजयंत्रणा बंद पडली, ३०० प्रवाशांचा क्रेनने बचाव, २२० जणांना स्थानकात उतरवले
रस्ते वाहतुकीला फटका
घोडबंदर रोड, कळवा- विटावा पुलाखाली, शिळफाटा जंक्शन, नवी मुंबईतील दिघा येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. गरज असेल, तरच घोडबंदर रोडचा वापर करा, असे आवाहन करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली. ठाण्यावरुन घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चितळसर पोलिस ठाण्यासमोर, मानपाडा पुलाखाली, पातलीपाडा येथे पाणी साचले होते. मिरा-भाईंदर हद्दीत वर्सोवा, काजूपाडा आणि चेन्ना गाव येथेही कमरेपर्यंत पाणी साचून वाहतूक थांबली होती.
Eknath Shinde | ठाण्यात धो-धो पाऊस, मदतीसाठी स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर, ठाणेकरांना आवाहन
‘कल्याण-शिळ’ जलमय
डोंबिवली स्टेशन परिसरासह कल्याण-शिळ मार्गावर गुडघाभर पाणी साचले. पावसाचा जोर ओसरताच नाल्याच्या तोंडावर टाकलेला भराव हटवून पाण्याला मार्ग मोकळा करून देत कल्याण शिळ मार्ग दोन तासांनी सुरू करण्यात आला. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यासह आजूबाजूच्या बंगल्याच्या आवारात पावसाचे पाणी शिरले होते.
४०० नागरिकांचे स्थलांतर
पनवेल शहरातील खाडीलगत बैठ्या घरात पाणी शिरल्यामुळे ४०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले, पालिकेकडून त्यांच्या जेवणासह सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

