• Sun. Jun 14th, 2026
    Koyana Dam : पश्चिम घाटमाथ्यावर आभाळ फाटलं, कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांवर, सांगलीकरांवर महापुराची टांगती तलवार

    Satara News : राज्यात सुरू असलेल्या जोरदारा पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे नऊ फुटांनी उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग सुरू केला गेला आहे. त्यामुळे आता कृष्णा नदीकाठच्या लोकांसाठी पूराचा धोका निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : पश्चिम घाटमाथ्यावर सोमवारपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कोयना धरणाचे दरवाजे 9 फुटांनी उघडण्यात आले आहेत. धरणातील पाणीसाठा 99 टीएमसी झाल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आल्याने कोयना आणि कृष्णा नदीकाठी महापुराचे संकट निर्माण झाले आहे. पाऊस आणि धरणातील विसर्गाने सांगलीकरांची चिंता वाढवली आहे.

    साडे पाच टीएमसी पाण्याची आवक

    पश्चिम घाटासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात प्रति सेकंद 64 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी धरणाचे दरवाजे 9 फुटांनी उघडून 65,600 क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातील दोन्ही युनिटमधून 2100 असा एकूण 67,700 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesSatara News : रिक्षाचालकाचा कहर! टल्ली होऊन रिक्षा दामटवली, अनेक वाहनांना धडक; महिला कॉन्स्टेबलने थांबवताच फरफटत नेलं

    चोवीस तासांत उच्चांकी पावसाची नोंद

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत 659 मिलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे सर्वाधिक 316 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयनानगर येथे 192 तर महाबळेश्वरला 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणात प्रति सेकंद 60 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात तब्बल साडे पाच टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
    Maharashtra Timesदेवदर्शन करुन घरी निघाले, वाटेत काळाचा घाला; ट्रॅक्टर दरीत कोसळून भीषण दुर्घटना, दोघांचा मृत्यू,२४ जखमी

    पूल, बंधारे पाण्याखाली

    धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं कोयना नदीवरील मूळगाव पूल आणि वेण्णा नदीवरील किडगाव, म्हसवे पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच कोल्हापूर पद्धतीच बंधाऱ्यांनाही जलसमाधी मिळाली आहे. कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कराडच्या कृष्णा नदीचे वाळवंट पुराच्या पाण्याखाली जाऊ लागले आहे. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं सांगलीकरांची चिंता वाढली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा