Marathwada Rain Update: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला असून ३८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अनेक गावे पुराच्या वेढ्यात सापडल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर हसनाळ येथे दोन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २०.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर जालना ३५.९, बीड ३४.९, लातूर ४९.९, धाराशिव १४.५, नांदेड ३७, परभणी ३२.३ आणि हिंगोली २६.५ असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. विभागात सरासरी ३२.३ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड (४३.२), कंधार (४७.३), देगलूर (७७), किनवट (४६.१) तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावात पाणी शिरल्याचे प्रशासनाने सांगितले. ओढ्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत.
बीड जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला आहे. परळी तालुक्यात सर्वाधिक ९९.५ मिमी पाऊस झाला आहे. गेवराई (५६.६), माजलगाव (८८), धारुर (५९.८) असा तालुकानिहाय पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावणगाव, भेंडेगाव, भिंगोली, भाटापूर, हसनाळ, मुक्रमाबाद, मारजवाडी अशा गावात लेंडी प्रकल्पाच्या पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने राज्य आपत्ती प्रतिसादाच्या जवानाने ‘एनडीआरएफ’च्या बोटीने जवानांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. मुखेड तालुक्यात पूरपरिस्थिती कायम असून अकरा नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. हसनाळ येथील गंगाबाई गंगाराम मादळे (वय ६०) आणि भिमाबाई हिरामण मादळे (वय ५५) यांचा मृतदेह बुडीत गावातून बाहेर काढण्यात आला.
Kolhapur Rain : कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, पंचगंगा पात्राबाहेर, अनेक गावांचा संपर्क तुटला, रेड अर्लट जारी
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. विभागात ३८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा (६६.२५ मिमी) पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील विरेगाव (७०.२५), वडीगोद्री (७५.५०) आणि शेलगाव (६५.२५ मिमी) असा पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई (१०१.२५), जातेगाव (११५), उमापूर (७३.५०), सिरसादेवी (११५), माजलगाव (७८), किट्टी वाडगाव (७८), तालखेड (८७.२५), नित्रुड (८८.२५), दिंद्रुड (१०८.२५), उजनी (८४), नागापूर (९२.५०), सिरसाळा (१२२.२५), पिंपळगाव (१२५.५०), तेलगाव (८८.२५) असा मंडळनिहाय पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर (१२३.२५), किनगाव (१२२.२५), अंधोरी (१२५.७५), हडोळती (९२.२५), नागलगाव (१२३.७५), वाढवणा (७९), मोघा (१००.२५), हेर (६८.५०), तोंडार (८३.७५), चाकूर (७१.७५) या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मारखेल (१५४.७५), माळेगाव (१२७.२५), इसापूर (१२०), जलधारा (९०.७५), शिवनी (८०) असा मंडळनिहाय पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातील माखणी (९०.७५), राणी (८७.२५), पिंपळदरी (९५) आणि रामपुरी (८८.७५) मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
धरणात पाणीसाठा वाढला
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर धरणात पाणीसाठा वाढत आहे. मोठ्या ११ धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरणात ९४.४० टक्के पाणीसाठा आहे. निम्न दुधना ६९, येलदरी ९९.५९, सिद्धेश्वर ९२.४९, माजलगाव ४८.९१, मांजरा ९३.७३, पेनगंगा १००, मानार ९०.२६, निम्न तेरणा ९५.४०, विष्णुपुरी ६२.८२ आणि सिना कोळेगाव ८६.४४ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा झाला आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पातही मोठा पाणीसाठा झाला आहे.
