• Fri. Mar 13th, 2026

    Snake Bite Death: झोपेत सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा रुग्णालयावर गंभीर आरोप, नागपुरातील घटना

    Snake Bite Death: झोपेत सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; कुटुंबीयांचा रुग्णालयावर गंभीर आरोप, नागपुरातील घटना

    Snake Bite Death In Nagpur: रात्री झोपेत सर्पदंशाने तरुणाला त्रास होऊ लागला, रुग्णालयात वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    snate bite nagpur(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: सर्पदंश झाल्यानंतर १७ वर्षीय तरुणाला रुग्णालयात नेऊनही त्याच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याला जीव गमवावा लागला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. ओम उपाख्य प्रीतम नंदकिशोर येनुरकर, असे या तरुणाचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी होता.

    खापरी येथील रहिवासी असलेल्या ओम येनुरकर हा पलंगवार झोपला असताना २ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या हाताला काहीतरी चावल्याचा भास झाला. यामुळे तो उठून बसला. त्याच्या वडिलांनी आजुबाजूला शोध घेतला मात्र काहीही आढळले नाही. त्यामुळे उंदीर असेल असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र एक-दीड तासाने ओमला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी एम्स येथे नेण्यात आले. तेथे त्यांनी ‘मुलाला काहीतरी चावले. कदाचित उंदीर असू शकतो’, असे सांगितले आणि लक्षणांवरून डॉक्टरांनाही हा सर्पदंश असू शकतो हे लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला अतिदक्षता विभागात हलविण्याऐवजी बाहेरच स्ट्रेचरवरच सलाइन लावले. मात्र मुलाची प्रकृती बिघडत होती. त्यामुळे त्याचे वडील व अन्य नातेवाईक डॉक्टरांना लक्ष द्यायला सांगत होते, तर ‘इंजेक्शन दिले आहे वेळ लागेल’, असे डॉक्टर सांगत राहिले.
    Maharashtra TimesShalarth ID Scam : ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यातील सूत्रधार अटकेत, चार महिन्यांनंतर मुसक्या आवळल्या
    सकाळी १० वाजतापर्यंत त्याला स्ट्रेचरवरच सलाइन लावून ठेवले हेते. त्यामुळे कुटुंबीयांनी तेथे आरडाओरड सुरू केली. तोवर त्याचा श्वास बंद होऊ लागला होता. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे ९ ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.
    Maharashtra Timesमुस्लिमांच्या लांगुलचालनामुळे वंदे मातरम राष्ट्रगीत होऊ शकले नाही; शरद पोंक्षेंचा काँग्रेसवर घणाघात
    सर्पदंशानंतर रुग्णाची लक्षणे पाहून त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असते. बरेचदा दंश करणारा साप आढळून येत नाही आणि आढळला तरी घरच्यांना तो विषारी आहे की बिनविषारी हे कळत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी लक्षणांवरून उपचार करणे गरजेते असते. ओमची लक्षणे पाहता त्याला नाग किंवा मण्यारने दंश केला असावा. मण्यार हा रात्रीच निघतो आणि त्याचा चावाही बरेचदा लक्षात येत नाही. तसेच त्याची लक्षणेही दंश झाल्यानंतर काही वेळाने दिसू लागतात, असे सर्प अभ्यासक व वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीचे सचिव नितेश भांदक्कर यांनी ‘मटा’ला सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा