Devendra Fadnavis: राज ठाकरे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 पासून मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं सांगत फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “2014, 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप सर्वांत मोठा पक्ष होता. मात्र आपला पक्ष मोठा आहे, असं म्हणायचा सगळ्यांना अधिकार आहे,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज यांना लगावला आहे.
महायुतीत सारं काही आलबेल नाही, हिंगोलीत मोठी धुसफूस, शिवसेना आमदाराचा भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप
मतदार याद्यांबाबतच्या गोंधळावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादी घोळाचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केल्यानंतर देशभरात सध्या हा मुद्दा चर्चेत आहे. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. मतदार याद्यांमधील चुका सुधारण्यासाठी पुनरीक्षण गरजेचं आहे, असं देवेंद्र यांनी स्पष्ट केलं. गेल्या २५ वर्षात याद्यांमध्ये सुधारणा न झाल्याने दोष निर्माण झाले आहेत. पुनरीक्षण झाले, तरच याद्या योग्य होतील, असं ते म्हणाले.
दरम्यान, “मतदारयाद्यांमधील चुका सुधारण्यासाठी मी 2012 मध्ये या दोषांविरोधात उच्च न्यायालयात गेलो होतो. आजही ती याचिका प्रलंबित आहे. या चुका सुधारण्यासाठी मतदारयाद्यांचे पुनरीक्षण करणे आवश्यक आहे. व्यापक पुनरीक्षण हाच यावरील उपाय आहे. निवडणूक आयोगाने आता हे काम सुरु केले आहे, पण काही लोक त्याला विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे,” अशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.

