Voter List Scam: बनावट मतदार महाराष्ट्रातही? चंद्रपूर जिल्ह्यात एका छोट्याशा घरात तब्बल ११९ मतदारांची नोंद आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून नेमकं काय आहे सत्य? जाणून घ्या…
घुग्घुस शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी घुग्घुस आणि पिपरी येथील एकाच खोलीत शंभरावर मतदार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. याबाबत चौकशी करण्यात आली असता पिपरी येथील अरुणा मच्छिंद्र कोटवाडे यांच्या घरात शंभराहून अधिक मतदार असल्याचे दिसून आले. कोटवाडे यांच्या मालकीचे ३७५ क्रमांकाचे हे लहानसे घर आहे. पती-पत्नी आणि दोन मुले असा चौघांचा संसार आहे.
Harshwardhan Sapkal: ‘कबुतर जिहाद’ भाजप सरकारचे पाप; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुलांची नावे मतदारयादीत नसल्याने या घर क्रमांकावर केवळ दोन मतदार असणे आवश्यक होते. पण, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ११९ मतदारांची नोंदणी झाली. हे सर्व मतदार गावातीलच असून हयात असल्याचे स्पष्ट झाले. हा बोगस मतदारांचा प्रकार नसून, मतदार नोंदणी करताना कर्मचाऱ्यांकडून झालेला संगणकीय लेखनदोष असल्याचे उघड झाले आहे. त्यात नमुना आठ अंतर्गत सुधारणा करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
Ambadas Danve: सरकारी तांदळाची आफ्रिकेत तस्करी; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी
असा झाला घोळ
संक्षिप्त मतदारयादी पुनर्निरीक्षण २०२४अंतर्गत पत्ता ‘अपडेट’ केला जातो. गावातील अनेक घरांना क्रमांक नसतात. त्यामुळे त्या व्यक्तीला काल्पनिक घर क्रमांक देऊन तो पत्ता टाकण्यात येतो. त्याशिवाय कम्प्युटर पत्ता स्वीकारत नाही. साधारणतः त्यात २० जणांची नावे एकाच पत्त्यावर राहू शकतात; परंतु या ठिकाणी चुकून ११९ मतदार एकाच पत्त्यावर टाकल्याने घोळ झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

