Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनावरून आलेल्या तरूणीने आपे जीवन संपवले आहे. वडिलांना शेवटचा फोन केला, त्यानंतर तिने घराचा दरवाजा काही खोलला नाही. नेमकं काय घडलं जाणून घ्या.
गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१, रा. सांगलीवाडी, सांगली) ही विद्यार्थिनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. विद्यापीठातीलच सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहातील खोली क्रमांक 54 मध्ये ती राहत होती. गावी जाऊन सोमवारी विद्यापीठात परतल्यावर वसतिगृहातील रुममध्ये ओढणीने गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे.
रक्षाबंधनासाठी तीन दिवस गावी जाऊन आलेली गायत्री 11 ऑगस्ट रोजी सकाळी कोल्हापुरात पोहोचली. साडेअकराच्या सुमारास तिने वडिलांना फोन करून आपण सुखरूप पोहोचल्याचेही कळवले होते. त्यानंतर ती रुममध्ये गेली. दुपारी तिच्या इतर रुममधील मैत्रिणी परतल्या तेव्हा दरवाजा आतून बंद होता. हाका मारून, गायत्रीला फोन करूनही त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. गायत्रीने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला होता. सुरक्षारक्षक आणि वसतिगृह अधीक्षिका आल्यावर दरवाजा तोडण्यात आला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती समजताच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी वसतिगृहाकडे धाव घेतली.
कोल्हापूरात ठाकरे गट आक्रमक; महापालिकेला घेराव, जिल्हाप्रमुख म्हणाले, पालिकेत भ्रष्टाचाराची स्पर्धा..
शवविच्छेदनाला विरोध आणि वाद
राजारामपुरी पोलिसांचे पथक प्रभारी पोलीस निरीक्षक सरगर यांच्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी झालेली गर्दी हटवली. गायत्रीच्या कुटुंबियांना याबाबत माहिती कळवण्यात आली. वसतिगृह परिसरात गायत्रीचे आई-वडील, बहिणी पोहोचल्यानंतर त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र नातेवाईकांनी शवविच्छेदनालाही विरोध दर्शवला होता. त्यावरुनही काही काळ वाद झाला.
Kolhapur Crime : शेतातली माती उकरलेली दिसली, प्लास्टिकच्या पिशवीने शंका वाढली, पोलिस पाटलांना बोलावलं, अन्… कोल्हापूरमधील हातकणंगले हादरलं
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
गायत्री अगदी आनंदात गावावरुन वसतीगृहात परतली होती. त्यानंतर अचानक तिने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र पोलिसांनी चौकशी करुनही आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. त्यामुळे सर्व बाजूंनी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अखेर कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार
विद्यापीठ वसतीगृह आणि आत्महत्या
विद्यापीठाच्या वस्तीगृहातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. याआधी 2014 मध्ये सांगली जिल्ह्यातीलच एका विद्यार्थिनीने तीन नंबर वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आताही पुन्हा आत्महत्येची घटना घडली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठात विषप्राशन करुन, गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, इतर विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे त्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले होते.

