Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्करणाला काही महिने नाही झाले नाहीत, तशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय स्नेहासोबत काय घडलं? जाणून घ्या.
ही घटना ९ ऑगस्ट २०२५ रोजी घडली असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू, दिर, नणंद, नणंदेचा पती आणि सासऱ्यांचे साडू अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणी स्नेहाचा पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दिर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे, नणंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींनी संगणमत करून स्नेहावर विवाहानंतर सतत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Baramati Plane Accident : बारामतीत पुन्हा शिकाऊ विमानाचा अपघात, पुढील टायर निखळल्याने नियंत्रण सुटलं, अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल झेंडगे यांचा विवाह मे २०२४ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस स्नेहाचे आयुष्य सुरळीत चालले, मात्र लवकरच सासरकडून त्रास सुरू झाला. पती व कुटुंबीयांनी कंपनी सुरू करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम आणून द्यावी म्हणून स्नेहावर वेळोवेळी दबाव आणला जाऊ लागला. पैसे मिळवण्यासाठी केवळ मानसिक छळच नव्हे तर मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारची वागणूक दिली जात होती.
वृक्ष लागवडीवर भाषण, त्यावरच प्रश्न, पण अजित पवार चिडले; पुण्याच्या पालकमंत्रीपदावर मिश्किल उत्तर
स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर ९ ऑगस्ट २०२५ रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.स्नेहाने यापूर्वी पोलिसांत एक गुन्हा दाखल केला होता, मात्र सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांनी तिला दम देऊन तो गुन्हा मागे घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे स्नेहाचे मानसिक तणाव अधिकच वाढले. सातत्याने होणारा छळ, आर्थिक मागणी आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे ती पूर्णपणे खचली. अखेर ९ ऑगस्ट २०२५ रोजी घरात कोणी नसताना स्नेहाने गळफास घेऊन जीवन संपवले.
या घटनेनंतर मयत स्नेहाचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, व्यवसाय – शेती, रा. कर्देहळी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४९८अ, ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर काही दिवसांतच घडलेली ही दुसरी घटना असल्याने, समाजात पुन्हा एकदा चर्चा आणि संतापाची लाट उसळली आहे. विवाहानंतर आर्थिक मागण्या, हुंड्यासारख्या प्रथांचा पुनरुज्जीवन आणि मानसिक छळामुळे महिलांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, हे वास्तव अत्यंत चिंताजनक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

