Adivasi Communities: एका सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील कोलाम, माडिया गोंड, आणि कातकरी यांसारख्या तीन आदिम जमाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची एकत्रित लोकसंख्या ५.४३ लाखांवर आली आहे आणि त्यापैकी माडिया जमात विदर्भातून जवळजवळ हद्दपार झाली आहे, त्यांचे अस्तित्व फक्त गडचिरोली जिल्ह्यातच शिल्लक आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या तीन जमातींचे वास्तव्य राज्यातील ३६ पैकी १७ जिल्ह्यांपुरते मर्यादित असले तरी माडिया ही जमात विदर्भातून हद्दपार होत असल्याचे भीषण वास्तव आहे. माडिया जमातीचे गडचिरोली जिल्ह्यापुरतेच अस्तित्व आता शिल्लक राहिले आहे. या आदिम जमातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पुणेस्थित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आदिवासी जमात कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आदिवासी विभागात बनवेगिरीची ‘स्कीम’; बनावट लाभार्थी दाखवून साडेसहा कोटी लाटले, प्रकरण काय?
देशात मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. राज्यातील अनुसूचित जमातींच्या यादीत एकूण ४७ आदिवासी जमातींचा समावेश आहे. देशात आदिवासी जमातीची लोकसंख्या ८.६ टक्के असली तरी राज्यात हेच प्रमाण ९.३५ टक्के आहे. देशात ५००पेक्षा अधिक अनुसूचित जमाती आहेत.
मात्र कोलाम, माडिया आणि कातकरी या आदिम जमातींची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे केंद्राने त्यांना आदिम जमाती म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे सरकारने या जमातींच्या संरक्षणासाठी आदिम जमाती संवर्धन व विकास योजना हाती घेतली आहे.
शिवसैनिकांनी कृषिमंत्र्यांना पत्ते दाखवले, राष्ट्रवादीकडून कोकाटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
आदिम जमाती कक्ष स्थापन
माडिया गोंड ही आदिम जमात गडचिरोली जिल्ह्यातच शिल्लक राहिली आहे. त्यामुळे या तिन्ही आदिम जमातींच्या संरक्षणासाठी आता आदिम जमाती संवर्धन व विकास योजना सुरू करण्यात आली असून, त्यासाठी ‘टीआरटीआय’ मध्ये (ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) आदिम जमाती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आता या कक्षामार्फत या जमातींचे संवर्धन करण्यासह त्यांना योजनांचा लाभ देऊन रोजगार उपलब्ध करून देणे आणि स्थलांतर रोखण्यासाठी केंद्रानेच पुढाकार घेतला आहे.

