• Mon. Mar 9th, 2026
    35 वर्षे भाजपशी एकनिष्ठ नेत्याच्या हाती घड्याळ, दादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

    35 वर्षे भाजपशी एकनिष्ठ असलेल्या नेत्याने आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद अजून वाढली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड :- बीड जिल्ह्याच्या राजकारणात अनेक नवीन बदल घडत असताना पाहवयास मिळत आहेत. अश्या परिस्थितीत आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात ज्यांची ओळख आहे असे वडवणी येथील राजाभाऊ मुंडे अन् त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडें यांची साथ सोडत आज राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे. वडवणी येथे आयोजित मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून मुंडे पिता पुत्र आता अजित पवार यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला .

    या प्रवेशावरून देखील अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे पाहवयास मिळाले आहे. तर अजित पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले स्वागताचे बॅनर वरून देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात बीड जिल्ह्यात गटबजी होत असल्याचे समोर आली आहे. अजित पवार यांचे स्वागत बॅनरने सर्व शहरभर लावले गेले. मात्र त्या बॅनरवर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांचे फोटो लावण्याचे टाळण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.

    पालकमंत्री नाहीत अन् मतदारसंघाशी संबंध नाही
    याविषयी खुद राजाभाऊ मुंडे यांनी म्हटले आहे की त्यांचे फोटो लावण्याचे काही कारण नाही जर ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असते तर नक्कीच त्यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला असता मात्र ते पालकमंत्री नाहीत आणि त्यांचा आमच्या माजलगाव मतदार संघात काहीच संबंध नाही म्हणून त्यांचे फोटो लावणे आवश्यक वाटले नाही असे राजाभाऊ मुंडे यांनी बोलताना म्हंटले आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीत उपस्थिती
    आज झालेल्या बीड जिल्हाधिकारी कार्यालय बैठकीमध्ये आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित होते मात्र त्या पुढील कार्यक्रमात धनजंय मुंडे हे दिसले नाहीत. आता होत असलेल्या वडवणी येथील मेळाव्यात देखील ना धनंजय मुंडे यांनी येण्याचे टाळले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.या निमित्ताने परत एकदा अजित पवार यांच्या पक्षात गटबाजी होत आहे ती कश्या पद्धतीने दूर करणार आता हे पाहणे आवश्यक आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा