Mother Son Death : कुटुंब अविनाश यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच अविनाश यांच्या आई सुधाताई पाटील यांचेही निधन झाल्याचे वृत्त आले.
कुमठे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकजवळ वास्तव्यास असलेल्या पाटील कुटुंबावर मंगळवारी पहाटे पहिला आघात झाला. युवा पिढीतील नावाजलेले पैलवान अविनाश पाटील यांचे दीर्घ आजाराने पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 7.30 वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
कुटुंब आणि गावकरी या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच सकाळी 11 वाजता दुसरा आघात झाला. अविनाश यांच्या आई सुधाताई पाटील यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले.
गावाच्या हृदयात स्थान
अविनाश पाटील हे कुस्ती क्षेत्रातील जिद्दी आणि कणखर पैलवान म्हणून परिचित होते. त्यांच्या धैर्याने आणि मैदानावरील कर्तृत्वाने ते तरुणाईसाठी प्रेरणास्थान होते. तर सुधाताई या धार्मिक, संयमी आणि सौम्य स्वभावासाठी गावात मानल्या जात. त्यांचा मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारा होता. या दोघांच्या निधनाने गावाने आपले दोन आधारस्तंभ गमावले आहेत.
पाच दिवसांपासून सुरू असलेलं प्रशिक्षणार्थ्यांचं उपोषण स्थगित, उदय सामंतांच्या मध्यस्थीला यश!
गावकऱ्यांचा आक्रोश, कुटुंबाला आधार
“एकाच दिवशी मायलेक गमावण्याची वेदना कोणालाही सहन होणारी नाही. अविनाश आणि सुधाताई यांच्या जाण्याने आमच्या गावाची अपरिमित हानी झाली आहे,” अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. पाटील कुटुंबाला या संकटातून सावरण्यासाठी गावकरी आणि नातेवाईकांनी पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Pune Crime : पुण्यात बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत म्हणाली आई-बाबा माफ करा पण…
ही दु:खद घटना केवळ कुमठे गावापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तासगाव तालुक्यातील प्रत्येकाच्या मनात हळहळ निर्माण करणारी ठरली. एकाच दिवशी दोन प्रिय व्यक्तींच्या निधनाने जीवनाच्या अनिश्चिततेची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
Crime News : पतीपासून विभक्त, 27 वर्षीय तरुणीला वकिलाने जाळ्यात ओढलं; आजारपणातही शरीरसंबंधांचा दबाव, दोनदा गर्भपात
शोकाकुल वातावरणातही एकजुटीची भावना
पाटील कुटुंबाच्या दुःखात गावकरी आणि परिसरातील लोक सहभागी झाले. अंत्यसंस्कारावेळी आणि त्यानंतरही गावकऱ्यांनी एकत्र येऊन कुटुंबाला आधार दिला. ही एकजूट आणि मानवतेची भावना कुमठे गावाच्या सामाजिक बांधिलकीचे द्योतक मानले जात आहे.

