Maharashtra Weather Forecast : मराठवाड्यात मागील जवळपास आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस नसल्याने उकाडा वाढला असून उन्हामुळे पिकं कोमेजली आहेत. त्याशिवाय किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळतोय. हवामान खात्याने पुढील जवळपास दहा दिवसाची पावसाची अशीच परिस्थिती राहण्याचं सांगितलं आहे.
पिके वाढण्याच्या अवस्थेत असताना मराठवाड्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. उकाडा वाढलेला असून त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. कणसे, शेंगा भरण्याची स्थिती असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Vidarbha Rain : विदर्भात पावसाची विश्रांती, तापमानात वाढ; पुढील सात दिवस कसं असेल हवामान? IMD ची महत्त्वाची माहिती
मराठवाड्यात आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यात पावसाचे समाधानकारक प्रमाण आहे. मात्र, इतर पाच जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. यंदा जुलै अखेरपर्यंत पेरणी सुरू होते. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे पेरणी करता आली नाही. कापसाचे १२ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तूर, मका, सोयाबीन, मूग या पिकांनाही कमी पावसाचा फटका बसला आहे.
ऑगस्ट महिन्यात पिकांची वाढीची अवस्था असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाढता उष्मा बाष्पीभवनास कारणीभूत ठरला आहे. त्यातून किडी आणि अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. पुढील आठ ते दहा दिवस पाऊस राहणार नाही. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
Beed | बीडमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकऱ्यानं हुंदका देत मांडल्या व्यथा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी २९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस तुलनेने थोडा जास्त आहे. कन्नड तालुक्यात सर्वाधिक ४१३ मिमी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा ४३ टक्के जास्त पाऊस आहे. गंगापूर तालुक्यात १९८.१ मिमी पाऊस झाला आहे. हा सर्वात कमी पाऊस आहे. सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात ९३ टक्के टक्के म्हणजेच समाधानकारक पाऊस झाला असल्याचे जिल्हा कृषी हवामान केंद्राने म्हटले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३७३ मिमी पाऊस झाला होता. यंदा पावसात मोठी घट झाली आहे.

