Nitin Gadkari on Jawarharlal Nehru and Gandhi : नितीन गडकरी यांनी जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या दृष्टीकोनाचा संदर्भ देत एक संतुलित भाष्य केले आहे.
गडकरी म्हणाले, ‘गांधीजी आणि नेहरूजी यांचे दोन विचार फार प्रसिद्ध आहेत. नेहरू म्हणायचे ‘आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हवे’ तर गांधीजी म्हणायचे ‘जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून अधिकाधिक उत्पादन हवे’. या दोन्ही दृष्टिकोनांचा संगम म्हणजेच आजच्या काळात समावेशक आणि परिणामकारक विकास.’ असे गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी, पोलिस लोकेशनला पोहोचताच…
राजकीय चर्चांमध्ये नेहरूंवर काश्मीर, चीन आणि समाजवादी धोरणांबाबत टीका केली जाते, तर गांधीजींवर फाळणीवेळी पाकिस्तानला मदतीसाठी आग्रह धरल्याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. मात्र गडकरींचे वक्तव्य हे नेहरू-गांधी धोरणांचा आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने सकारात्मक उपयोग करणारे असल्याने महत्त्वाचे ठरते.
विदर्भाच्या संदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, “विदर्भात महाराष्ट्रातील ७५ टक्के खनिजसंपत्ती, ८० टक्के जंगल आणि कोळशाचे विपुल साठे आहेत. या निसर्गसंपत्तीचा योग्य वापर करून हरित उद्योग, स्टील, कृषी प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करता येऊ शकतो. नागपूर हे मॉडेल सिटी म्हणून पुढे यावे.’ ते पुढे म्हणाले, ‘रोजगारनिर्मिती ही आमची प्राथमिकता आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून आणि विदर्भातून निर्यात वाढवून संपूर्ण क्षेत्र समृद्ध करता येईल. विदर्भ समृद्ध झाला, तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि त्यातून भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा आत्मनिर्भर भारताचा स्वप्न साकार होईल.’ गडकरी यांनी विदर्भाला ‘हरित उद्योग आणि एकात्मिक लॉजिस्टिक्सचे केंद्र” बनवण्याची गरज व्यक्त केली. ‘नागपूर हे एक मॉडेल शहर बनू शकते, जिथे पायाभूत सुविधा उद्योगांना आधार देतात आणि लघुउद्योगांना उभारी मिळते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

