Sanjay Raut on Devendra Fadnavis : खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत विधानसभा निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप करत केला. शिवाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावरही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
‘५० खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल आहेत. विधानसभा सुरू असताना विधानभवनाच्या आवारात कैलास गोरंट्याल यांनी ५० खोके एकदम ओके ही घोषणा दिली होती आणि त्यानंतर ती अख्ख्या देशामध्ये पसरली. आता ते देवेंद्र फडणवीसांच्या पक्षात आहेत. त्यांनी काल असं सांगितलं आहे, की विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका-एका मतदारसंघात १०० कोटी खर्च केले. पोलिसांच्या सरकारी वाहनातून पैशांचं वाटप सुरू होतं. त्यानंतर गोरंट्याल म्हणतात आमच्यासारखे कार्यकर्ते कुठे पुरे पडणार? त्यामुळे मला भाजपात यावं लागलं, असं ते म्हणाले आणि आज ते फडणवीसांच्या पक्षात आहेत.’
‘राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या जागेसाठी कशाप्रकारे हेराफेरी केली, त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी बोलायला हवं. राज्यात शेतकरी आत्महत्या होतात, बेरोजगारी आहे त्यावर त्यांनी बोलायला हवं. किती काळ फडणवीस उद्धव ठाकरे ंवर बोलून अडकून पडणार आहेत. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले आहेत. त्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत’, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

