• Sat. Mar 7th, 2026
    Sanjay Shirsat: सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

    Sanjay Shirsat: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे. अकोला दौऱ्यादरम्यान त्यांनी सरकारी निधीवरुन वादग्रस्त विधान केले.

    sanjay shirsat news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, अकोला: मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्य सरकारची वारंवार कोंडी होत असल्याने मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांना बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत तंबी दिली होती. शिक्षा म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातेसु्द्धा काढून घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही मंत्र्यांची वादग्रस्त विधाने थांबत नसल्याचे शनिवारी पुन्हा एकदा दिसून आले.

    अकोल्यात सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी आलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला. ‘वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटी असे कितीही पैसे मागा. आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे. आपल्या बापाचं काय जातंय,’ असे वक्तव्य शिरसाट यांनी केले. शिरसाट यांच्या निमित्ताने विरेाधकांना पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. शिरसाट यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मंत्र्यांच्या या बेताल वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.
    Devendra Fadnavis: बेशिस्तपणा चालणार नाही! CM फडणवीसांची वाचाळ मंत्र्यांना तंबी; कठोर कारवाईचा इशारा
    निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला आ. हरीश पिंपळे, आ. अमोल मिटकरी, आ. साजिद खान पठाण, सत्यपाल महाराज, समाजकल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम आदी उपस्थित होते.
    Raj Thackeray: महाराष्ट्राला नख लावणाऱ्यांना अंगावर घेऊ; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
    पवन जयस्वाल शिवसेनेत
    नेरचे माजी नगराध्यक्ष पवन यांनी जयस्वाल शिवसेना (उबाठा) ला जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ३१ जुलै रोजी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. जयस्वाल यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल यांच्यासह २८ जणांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. दारव्हा विधानसभा मतदारसंघातून पवन जयस्वाल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी थेट राहुल गांधी यांच्या मार्फत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा घडवून आणल्यावर ही जागा काँग्रेससाठी सोडली. त्यानंतरही जयस्वाल ठाकरेंसोबत होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा