• Tue. Jun 16th, 2026
    Maharashtra Monsoon: आला रेss आला! महाराष्ट्रात मान्सून धडकला, शेतकरी राजा सुखावला, लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात बरसणार

    Maharashtra Monsoon: मान्सूनने अखेर तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता बळीराजासाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अखेर महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मान्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी मान्सूनने तळकोकणात प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा केली. गोवा पूर्णपणे व्यापल्यानंतर मोसमी वाऱ्यांनी दक्षिण कोकणात हजेरी लावली असून आता मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

    यंदा मान्सूनचे केरळमध्ये आगमन नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने झाले. ४ जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने त्यानंतर वेग पकडला. अवघ्या दोन दिवसांत त्याने कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि अरबी समुद्रातील आणखी काही भाग व्यापत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत मजल मारली. हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल आहे.

    मुंबईकडे लक्ष

    मान्सून तळकोकणात दाखल झाल्यानंतर पुढील टप्पा मुंबई आणि उत्तर कोकणाचा असतो. अनेकदा दक्षिण कोकणात आगमन झाल्यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकतो. त्यामुळे मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही भागांत पावसाचा जोर वाढण्यासह वाऱ्याचा वेगही वाढू शकतो.

    उष्णतेनंतर दिलासा

    एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. विशेषतः विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अधूनमधून झालेल्या वादळी पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष मान्सूनकडेच लागले होते. आता अधिकृत प्रवेश झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

    गेल्या वर्षीपेक्षा वेगळी स्थिती

    गेल्या वर्षी मान्सूनने २४ मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो तळकोकणात पोहोचला आणि २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. यंदा केरळमध्ये आगमन उशिरा झाले असले तरी पुढील प्रवास तुलनेने वेगाने होताना दिसत आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली आहे. त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल आणि आगामी पर्जन्यमान कसे राहणार, याकडे शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा