Maharashtra Politics: संजय शिरसाट, योगेश कदम यांना संभाव्य कारवाईपासून वाचवण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना यशस्वी झाले.
विधान परिषदेत मोबाइलवर पत्त्यांचा डाव मांडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडले होते. त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील खोलीत पैशांनी भरलेल्या कथित बॅगांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे परवाना असलेल्या मुंबईतील बारमध्ये मुली नाचवल्या जात असल्याचे व या बारवर पोलिसांनी धाड टाकल्याचे पुरावे समोर आले. त्यामुळे विरोधी पक्षाने या वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Mumbai Crime: तीन लग्नं मोडली, प्रेग्नंट होताच चौथा तरुणही पळाला, दुर्धर आजारी महिलेचं भयंकर कृत्य, 6 महिन्याच्या लेकराला…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शहा यांना वादग्रस्त मंत्री आणि त्यांच्यावरील आरोपांची माहिती दिली. कोकाटे यांचे मोबाइलवर पत्ते खेळतानाचे चित्रण समोर आल्यानंतर ही कृती सरकारसाठी भूषणावह नसल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे समजते. तसेच, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांच्यावरील कारवाईसाठी अनुकूल होते. मात्र, धनंजय मुंडे यांच्यापाठोपाठ कोकाटे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यांचा बळी गेला तर त्यातून जनतेत चुकीचा संदेश जाईल. तसेच शिंदे यांच्या मंत्र्यांवर कारवाई होणार नसेल तर कोकाटे यांनाही शेवटची संधी मिळावी, या मतापर्यंत ते पोहोचले.
Devendra Fadnavis: बेशिस्तपणा चालणार नाही! CM फडणवीसांची वाचाळ मंत्र्यांना तंबी; कठोर कारवाईचा इशारा
कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पातळीवर झाला. मात्र, शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत अशी चर्चा पक्षात झाली नाही. याउलट शिंदे यांनी तातडीने दिल्लीत भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची भेट घेत शिरसाट आणि कदम यांची बाजू मांडताना यात कसे विरोधकांचे राजकारण आहे, हे लक्षात आणून दिले. साहजिकच कोकाटे, शिरसाट आणि कदम यांच्यावर एकाचवेळी कारवाई अपेक्षित असताना शिरसाट आणि कदम यांच्यावरील कारवाई आता मागे पडल्याचे समजते.
वसई-विरार महापालिकेत मोठा बांधकाम घोटाळा; प्रतिचौरस फूट १० ते २५ रुपये कमिशन, ईडीचा धक्कादायक खुलासा
कदम यांच्या राजीनाम्यावर परब ठाम
शिवसेनेचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांनी लावून धरल्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मात्र, आपण एवढ्यावर थांबणार नसून, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे परब सांगितले आहे. मुंबईतील सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली असून, नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता रद्द केल्याची माहिती समोर आहे. या बारमध्ये जेवण आणि मद्यसेवा देण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. बारवर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार १५ दिवस ते दोन महिने बार पूर्णतः बंदचे आदेश काढण्यात आले आहेत.

