Kachore Hill Soil Landslide : कल्याण पूर्वेत कचोरे टेकडीवर सततच्या पावसामुळे माती घसरली. घरांची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणी असलेल्या नागरिकांना हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
कल्याण पूर्वेत कचोरे टेकडीवर सततच्या पावसामुळे माती घसरली. यामुळे टेकडीच्या उतारावर असलेल्या घरांची भिंत खाली कोसळली. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने टेकडीवरील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली. गेल्या चार दिवसांपासून कल्याणमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
Kalyan : छातीत लाथ घातली, फरफटत नेलं, पीडिता कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडलीकल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीवर दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जाते. मात्र, यावर्षी अजून कोणालाही हलवले नाही. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्याचबरोबर दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत.
Kalyan News :’एमएमआरडीए’कडून उड्डाणपुलाचे काम थांबवण्याच्या सूचना; कल्याण स्थानक`कोंडीचे स्थानक’ ?कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीच्या मागील बाजूस गुरुग्राम आश्रमाजवळची माती घसरू लागली. हे पाहून नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. माती खचल्याने एका घराची भिंत दुसऱ्या घरावर पडली. यामुळे मोठं नुकसान झालं.
घडलेल्या नुकसानानंतर नागरिकांनी स्वतःहून उतारावरील काही घरे तोडली. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. “तीव्र उतारावर घरे बांधली असल्यामुळे माती घसरल्यास किंवा खचल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून आजूबाजूच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे,” असे हेमा मुंबरकर म्हणाल्या.
Kalyan Receptionist Case : गुंड गोकुळ झा लूक बदलून फरार, मनसेनं शोधून चोपला, क्लिनिकमध्ये काय घडलं ?
कल्याणमध्ये कचोरे टेकडी ही दरडप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जाते. येथे दरवर्षी पावसाळ्यात माती घसरण्याच्या घटना घडतात. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, धोकादायक ठिकाणी असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
