Crime News : राजकीय वैमनस्यातून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजीनाईक येथे एका कुटुंबाच्या घराला विजेच्या प्रवाहित तारा गुंडाळण्यात आल्या. यात त्या घरातील महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या पतीने गावातील सहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सहाही जणांना अटक केली आहे.
हायलाइट्स:
- घराला विजेच्या प्रवाहित तारा गुंडाळल्या
- महिलेचा तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू
- राजकिय वैमनस्यातून सूड उगवला
- सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
अश्यातच शुक्रवारी रात्री जेवणानंतर पवार कुटूंबीय घरात झोपले होते. दरम्यान शनिवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मनीष पवार यांची पत्नी सविता हीला नैसर्गिकविधीकरीता जायचे असल्याने तिने पती मनीष यांना उठविले. त्यानंतर सविता हीने दरवाजा उघडला असता, ती अचानक घरात पडली. तर मनीष पवार यांच्या हाताला व पायाला करंट असलेल्या तारांचा झटका लागल्याने ते घराबाहेर पडले. दरम्यान त्यांनी आरडओरडा करीत परिसरातील नागरिकांना बोलावले. त्यानंतर घरात बेशुध्द असलेल्या सविताला परिसरातील नागरिकांच्या मदतीने आर्णीतील शासकीय रूग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणीनंतर सविता हीचा करंट लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी मनीष पवार यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, माझ्या घराच्या बाहेरून तार बांधून त्याला आमच्या घरातील कोणाचा जीव जाईल, या उद्देशाने इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजु जाधव, चेतन चव्हाण कट रचून घराला करंट लावल्याने पत्नी सविता हीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सहाही जणांवर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहेत.

