• Wed. Jun 10th, 2026
    माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा भाजपात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, समीकरण कसे बदलणार?

    Maharashtra Politics : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रतिष्ठित, राजकीय घराणे अर्थात नाईक कुटुंबाचे वंशज ययाती नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ययाती हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आहेत.

    ययाती नाईक यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात हा पक्षप्रवेश केला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    कोण आहेत ययाती नाईक?

    ययाती नाईक हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नातू, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आणि विद्यमान राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
    Indraneel Naik : सलग ७२ वर्ष एकाच कुटुंबाचं एका मतदारसंघावर वर्चस्व, दोन मुख्यमंत्री दोन मंत्री, आताही रेकॉर्डब्रेक विजय
    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या हस्ते ययाती नाईक यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अरविंद मेनन, राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी आणि राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक सर्वेद्र सिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रवेशावेळी उपस्थित नेत्यांनी ययाती नाईक यांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले.
    Mangesh Kashikar : शिवसेना शहरप्रमुखाच्या हॉटेलवर धाड, पोलीसही चक्रावले, मंगेश काशीकरांवर गुन्हा दाखल
    ययाती नाईक यांच्यासारखा मोठा राजकीय वारसा असलेला तरुण नेता भाजपमध्ये आल्याने महाराष्ट्रात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. ययाती नाईकांच्या प्रवेशामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय दूरगामी परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची चिन्हे आहेत.

    भाजप-राष्ट्रवादीने दिली काँग्रेसला साथ; हणमंत पाटील बेटमोगरेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध

    Yayati Naik

    महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत. या प्रवेशामुळे भाजपला पुसद विभागात निवडणूक लढणे सोपे होईल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा