• Sun. Mar 8th, 2026
    घरातील पोत्याखाली आढळली नागाची जोडी, त्यानंतर एकामागून एक निघाली 21 पिल्लं, थरकाप उडवणारी घटना

    Baby Snakes Found :नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रातील चाचेर गावात एका शेतात २१ नाग सापडले. नितेश ठोसरे यांच्या शेतातील झोपडीत हे साप आढळल्यानंतर सर्पमित्रांनी तात्काळ कारवाई करत नागिणीच्या जोडीसह सर्व पिल्लांना सुरक्षितपणे जंगलात सोडले.

    नागपूर :
    नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रात एक धक्कादायक घटना घडली. चाचेर गावात एका शेतात चक्क 21 नाग सापडले. पावसाळ्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    पाहता पाहता 21 नाग पिल्ले आढळली

    रामटेक वनपरिक्षेत्रातील चाचेर गावात नितेश ठोसरे यांच्या शेतात ही घटना घडली. त्यांच्या शेतातील झोपडीत औषधांच्या पोत्याखाली साप दिसला. त्यांनी तातडीने सर्पमित्रांना बोलावले. वाईल्ड कॅलेंडरच्या सदस्यांनी सापाला पकडले. तेव्हा त्यांना आणखी एक साप दिसला. पाहता पाहता तिथे 21 नाग पिल्ले आढळून आली. या घटनेची माहिती तात्काळ रामटेक वन विभागाला देण्यात आली. वन विभागाने पंचनामा केला. नागिणीच्या जोडीसह 21 पिल्लांना सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यांना जंगलात सोडण्यात आले.गुरं पलीकडे अडकली, तरुण आणायला आणि पाण्याच्या प्रवाहात भयंकर घडलं, घरचा कर्ता गेला, कुटुंबाचा आक्रोश पावसाळ्यात साप आणि इतर सरपटणारे प्राणी सुरक्षित जागा शोधतात. ते मोकळ्या जागा, झोपड्या किंवा पिकांच्या भागात लपतात. त्यामुळे शेतात काम करताना शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. “शेतात काम करतांना सावधान, पावसाळा सुरू असून शेतात साप निघण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काम करताना खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे वन विभागाने सांगितले.

    दैव बलवत्तर! एका खड्ड्यात पडला, दुसऱ्या खड्ड्यातून बाहेर आला; नागपुरातील 9 वर्षीय चिंतेशची संकटाला फाईट राज्यात मान्सूनने चांगलाच जोर पकडला आहे. पावसाळ्यात जसं सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होतो तसंच, आस्मानी संकटाचाही धोका असतो. रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतात रोजंदारीवर धान रोवणीचे काम सुरू असताना अचानक आकाशातील संकटामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रशासनाने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही परिसरातून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शितलवाडी, भोजापूर आणि चारगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा