• Thu. Mar 12th, 2026
    भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, शंभर फूट फरफटत नेलं; पतीसह दोन चिमुकल्यांचा अंत अन् पत्नी… सुखी संसाराचा शेवट

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातून गावी साताळा बुद्रुक येथे पत्नीसह दोन मुलांना दुचाकीने घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव मालवाहू ट्रकने उडवले आहे. बापासह मुलगा व मुलगी जागीच ठार झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातून गावी साताळा बुद्रुक येथे पत्नीसह दोन मुलांना दुचाकीने घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला भरधाव मालवाहू ट्रकने उडवले आहे. धक्कादायक म्हणजे यात दुचाकी १०० फूट फरफटत नेण्यात आलं, यात बापासह मुलगा व मुलगी जागीच ठार झाले आहेत. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे घडली. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

    वृत्तानुसार फुलंब्रीमधील आळंद येथे ही दुर्घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, गोपाल मांगू चंदनशे त्यांचा मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले. तर पत्नी मीनाबाई मांगु चंदनशे या गंभीर जखमी झाले आहे. गोपाल चंदनशे पत्नी व दोन मुलांसह छत्रपती संभाजी नगर येथून साताळा बुद्रुक येथे दुचाकीने निघाले होते. दुचाकी फुलंब्री तालुक्यातील आळंदी येथे आल्यानंतर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर ट्रकने दुचाकीसह दुचाकी सर्वांना अक्षरश: १०० फूट फरपटत नेले. सर्वजण ट्रकच्या खाली दबल्याने क्रेन व जेसीबीच्या साह्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मिनाबाई यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Thane News : पाण्यात उडी घेतली अन् आयुष्याची दोर तुटली, ठाण्याच्या रायलादेवी तलावात 22 वर्षीय तरुणासोबत आक्रित घडलं
    दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी बघायची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गर्दीला हुसकावत रस्ता मोकळा केला. याप्रकरणी पोलिसांना मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे सारेच नागरिक हळहळले आहे.

    बुधवारी नाशिकमध्येही अत्यंत दुर्दैवी रस्ते अपघाताची घटना घडली. दिंडोरी येथे मोटरसायकल व अल्टो यांचा भीषण अपघात झाला, यात सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष व एका लहान बालकाचा समावेश आहे. अपघातातील अल्टो गाडीतील मयत हे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता Nashik येथे गेलेले होते. ते परत त्यांच्या गावी जात असताना Dindori कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्री बारा वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाली. त्यांच्या नाका तोंडात पाणी जाऊन कारमधील सातही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा