Bachchu Kadu: सर्व शेतकऱ्यांनी बंधने तोडून केवळ शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. शेतकरी जागा झाला तर सरकारला जागे करण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा ‘प्रहार’चे संस्थापक बच्चू कडू यांनी केले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून निघालेली बच्चू कडू यांची पदयात्रा रविवारी महागाव तालुक्यात दाखल झाली. यानिमित्त आयोजित सभेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. सत्तेत आल्यावर राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आहे.
कन्नडच्या माजी सरपंचाला भरदिवसा निर्घृणपणे संपवलं; तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर
सात-बारा कोरा पदयात्रेच्या निमित्ताने गावात जात असताना रोज अनेक शेतकरी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल महिला भेटतात. त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांच्या व्यथा ऐकून अनेकांना अश्रू अनावर होतात. सरकारला त्यांच्या वेदनांशी घेणे-देणे राहिलेले नाही, असेच दिसून येत असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला. सरकारचा निषेध म्हणून बच्चू कडू यांच्यासह पदयात्रेत सहभागी अनेकांनी डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.
अंधश्रद्धेचा कळस! कावीळ झालेल्या महिलेवर मांत्रिक ‘फादर’चे उपचार, मंतरलेलं तेल दिलं अन्…
आज समारोप
महागाव तालुक्यातील चिलगव्हाणजवळील अंबोडा येथे आज, सोमवारी पदयात्रेचा समारोप होणार आहे. चिलगव्हाण येथे २० मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणा याला कंटाळून पत्नी व चार मुलांसह विष घेऊन आत्महत्या केली होती.

